शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा मुलांना घ्यायचा असतो की, मुलांच्या आई-वडिलांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST

अहमदनगर : हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा असला तरी लग्न जमविताना दोन्ही बाजूकडील नातेवाईकांची पहिली बैठक ‘देणे-घेणे’ या विषयावरच असते. ...

अहमदनगर : हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा असला तरी लग्न जमविताना दोन्ही बाजूकडील नातेवाईकांची पहिली बैठक ‘देणे-घेणे’ या विषयावरच असते. हुुंड्यात रोख रकमेसह दागिने, घरगुती वस्तू, वाहन, फ्लॅट अशा विविध स्वरुपांची मागणी केली जाते. मुला-मुलीची इच्छा असो अथवा नसो, हुंडा घेतलाही जातो आणि दिला जातो. हुुंड्यावर मुलांच्या आधी त्यांचे आई-वडीलच हक्क सांगतात. पुढे याच हुंड्यावरून सासरी विवाहितांचा छळ होतो.

मुला-मुलीचे वय झाले की, माता-पिता लग्नासाठी स्थळ पाहतात. मुलीसाठी मुलगा नोकरीवाला, त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असावी, अशी अपेक्षा असते. मुलीच्या आयुष्याचे कल्याण व्हावे, या उद्देशातून आई-वडील वरपक्षाचे नातेवाईक मागेल ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. वरपक्षाकडूनही लग्नात जे काही पदरात पाडून घेता येईल तेवढे घेतात. इतके सारे काही देऊनही बहुतांशी मुलींना सासरी शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागतो. सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत अथवा कोणताही समाज असो, कोणत्याही तरी स्वरुपात हुंड्याची प्रथम आजही कायम आहे.

................

हुंडाविरोधी कायदा काय?

हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ रोजी करण्यात आला आहे. त्यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. हुंडा म्हणजे लग्नात मुलीला दिलेले सर्व वस्तू, चीजवस्तू, कपडे, रोख पैसे, सोने इत्यादी. यासंदर्भात तक्रार केली तर पोलिसांकडून हुंडा घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.

-------------------------

जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी

लग्नात अपेक्षित हुंडा दिला नाही तसेच माहेरून पैसे आणावेत आदी कारणांसाठी सासरी महिलांचा छळ केल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कलम ४९८ अंतर्गत ३२६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. हुुंडाबळीच्या १३ तक्रारी दाखल आहेत.

--------------

हुंडा ही रूढी-परंपरेने चालत आलेली चुकीची पद्धत आहे. ही प्रथा बंद होणे गरजेचे आहे. यासाठी लग्न करताने मुलांनी हुंडा घेऊन नये तर जो मुलगा हुंडा मागेल त्याला आई-वडिलांनी त्यांची मुलगी देऊ नये.

- सहदेव बोरुडे, तरुण

-------------------

समाजात हुंड्याची प्रथा प्रचलित असल्याने मुलीचे लग्न करताना आई-वडिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. हुंडा दिला नाही तर मुलीला सासरी त्रास होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे इच्छा नसतानाही हुंडा द्यावा लागतो. हुंडा देणार नाही आणि घेणार नाही असा निश्चय नवीन पिढीने केला तर ही पद्धत बंद होईल.

-वैशाली आहेर, तरुणी

------------------------