शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

हाच दोन्ही सरकारच्या कामातील फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST

तिसगाव : खावटी कर्ज योजनेचे या सरकारने खावटी अनुदान असे सुधारित रूपांतर केले. कर्जाची परतफेड असते. मात्र अनुदान संकटकाळात ...

तिसगाव : खावटी कर्ज योजनेचे या सरकारने खावटी अनुदान असे सुधारित रूपांतर केले. कर्जाची परतफेड असते. मात्र अनुदान संकटकाळात उभारीसाठी दिलेली मदत असते. हा दोन्ही सरकारच्या कामातील फरक आहे, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील आडगाव व शिरापूर येथे शुक्रवारी आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजनेंतर्गत नैमित्तिक किराणा मालाचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सरपंच काशिनाथ लवांडे, आदिनाथ सोलाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, शिवसेना नेते रफिक शेख, रोहिदास कर्डिले, जालिंदर वामन, माणिकराव लोंढे, बाबासाहेब बुधवंत आदी व्यासपीठावर होते. वसुली अभावी महावितरण, तर महामारीच्या संकटाने जनता अडचणीत आहे. वसुली सक्तीची असल्याची भावना होते. मात्र वीजबिलांच्या वसुलीतील तेहतीस टक्के रक्कम त्याच गावातील विजेची देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्याचे सरकारचे धोरणही लक्षात घ्यायला हवे, असे सांगून मंत्री तनपुरे म्हणाले, खावटी योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले. निकषांवर फारसे बोट न ठेवता, स्थळ पाहणी व वास्तवतेचे निरीक्षण करून वंचित व गरजूंना सामावून घेतले. हा प्रवाही कृतीभावही आघाडी सरकार जपत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रकल्प समन्वयक सुनील खेडकर यांनी प्रास्ताविक केले. नितीन लोमटे यांनी आभार मानले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष संजय पाखरे, किरण कराड, राजेंद्र म्हस्के, सुनील लवांडे, नितीन लवांडे, सुनील पुंड, सुरेश बर्फे, बबनराव बुधवंत, अजय पाठक, देवा झरेकर, राम शेलार, स्वीय सहाय्यक विजय टापरे, नारायण नजन आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.