शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीयोजना असूनही नागरिकांना मिळतेय अशुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST

टाकळीमियाँ गावासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज योजनेतून ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून पाणीयोजना ...

टाकळीमियाँ गावासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज योजनेतून ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून पाणीयोजना पूर्ण करण्यात आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये योजना पूर्ण झाली. ही योजना टाकळीमियाँ ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन सहा महिने झाले. या गावाला संपूर्ण दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. गावाला दूषित पाणीपुरवठा होत असून आरोग्य विभागाकडून प्रयोगशाळेत पाठविलेले नमुने शुद्ध असल्याचा अहवाल आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. योजनेची दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच विश्वनाथ निकम, सुरेश भानुदास करपे, अकबर सय्यद, आण्णासाहेब सगळगिरे, बाळासाहेब माने, जनार्दन गोसावी यांनी केली आहे.

..............

मुसळवाडी तलावातून पाणी शुद्धीकरण्यासाठी टाकळीमियाँ पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रात येते. येणारे पाणी हे अतिशय दूषित आहे. त्यातूनच संपूर्ण गावाला दूषित पाणी पुरवठा होतो. ग्रामपंचायतीला हे पाणी शुद्ध करण्यासाठी मासिक तीन लाख रुपये खर्च येतो. तरीही समस्या कायम आहे. याठिकाणी तत्काळ संपूर्ण तलावाला कुंपण भिंत व तलावातील गाळ काढणे अंत्यत गरजेचे आहे.

- सुरेश निमसे, ग्रामस्थ

...........

टाकळीमियाँ गावातील पिण्याचे पाण्याचे नमुने आपण दर महिन्याला प्रयोगशाळेत पाठवत असतो. या महिन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. परंतु मागील चार महिन्यांचे अहवाल हा शुद्ध पाणी असल्याचा आलेला आहे.

- डाॅ. कीर्ती मदने, मेडिकल ऑफीसर