शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल

By admin | Updated: August 24, 2014 23:08 IST

अहमदनगर: यंदाच्या बैल पोळा सणावरही दुष्काळाची छाया आहे़ पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके गेली आहेत़ त्याचा थेट परिणाम बैल पोळ्यावरही झाला

अहमदनगर: यंदाच्या बैल पोळा सणावरही दुष्काळाची छाया आहे़ पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके गेली आहेत़ त्याचा थेट परिणाम बैल पोळ्यावरही झाला असून, साहित्य खरेदीत कमालीचा निरुत्साह असल्याचे दिसून आले़ बैलांची घटती संख्या आणि दुष्काळाचे सावट, यामुळे साहित्याला उठाव नसल्याचे रविवारी गंजबाजारातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले़बैल पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ पोळा आला की सर्वांनाच उत्सुकता असते, ती बैल पूजनाची़ बैलांसाठी करण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीचे काम महिनाभरपासून सुरू असते़ बैलासाठी शिंदोरी, गोंडे, कसारा, काळे गंडे, घोगरमाळ, पैजनी कासारा, यासारखे साहित्य मोठ्या प्रमणात खरेदी केले जाते़ बळीराजा सवडीनुसार आपल्या आवडत्या बैलांसाठी काहीना काही खरेदी करतो़ पाऊस वेळेवर पडल्यास शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते़ परंतु यंदा वरुणराजाने पाठ फिरविली़ पाऊस वेळेवर झाला नाही़ पावसाने ओढ दिल्याने घरात नवीन पिके आली नाहीत़ खरिपाची पिके न आल्याने बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे़ सणावारांत होणारी खरेदीही मंदावली आहे़अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले खरे, पण उशिराने झाले आहे़ बैल पोळा सणासाठी होणाऱ्या खरेदीत त्यामुळे कमालीची घट झाली असून, साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ शेतकऱ्यांत साहित्य खरेदीसाठी उत्साह नसल्याचे जाणवले़ सकाळी शेतकऱ्यांनी गजबजलेल्या गंजबाजारात दुपारनंतर शुकशुकाट झाला़ शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने बाजारात निरुत्साही वातावरण असल्याचे चित्र होते़बैल पोळा सणाच्या साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे़ लोकरीच्या ८० रुपयात मिळणाऱ्या शिंगदोरीची किंमत ११० रुपये झाली आहे़ सुताचा ८० रुपयांना मिळणारा कासरा १२० रुपयांना झाला असून, इतर साहित्याचेही दर वाढले आहेत़ त्यामुळे साहित्याचे दर सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत़ दरवाढ झाल्याने शेतकरी किंमत विचारून निघून जात होते़ ग्राहकांची संख्या एकदम घटल्यामुळे व्यापारी फारशी घासाघीस न करता साहित्याची विक्री करत होते़ परंतु शेतकऱ्यांना साहित्य खरेदीत फारसा रस नव्हता़ यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे़ पूर्वी ज्या गावात ५०- ६० जोड्या असायच्या त्या गावात सध्या पाच ते सहा जोड्या पाहायला मिळत आहे़ त्यात दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे़ त्यामुळे शेतकरी सातत्याने दुष्काळाच्या छायेत असून, इच्छा असून त्यांना बैल ठेवता येत नाहीत़ त्यामुळे पोळ्याच्या साहित्याला उठाव नाही़- रामदास पटवेकर, व्यापारी पाऊस वेळेवर झाला नाही़ पाऊस नाही तर पिकही नाही़ आता कुठे पाऊस सुरू झाला आहे़त्याला फारसा जोर नाही़ पाऊस नसल्याने खरिपाचे पीक आले नाहीत़ पीक न आल्याने पैसे येणार कुठून पोळा तसा महत्वाचा सण़ पण पीक न आल्याने कसा-बसा सण साजरा करायचा़ मुक्या बैलांना तसे ठेवता येत नाही़ म्हणून ही खरेदी करावी लागत असून, परंपरेनुसार जे आपण खरेदी करतो़ तेच साहित्य घेऊन सण साजरा करायचा विचार आहे़ - बबन बोरुडे, शेतकरी सारोळा बध्दी