शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानयुगात साथरोगाच्या देवता पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

कोेतूळ : महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या वेशीवर साथ रोगाची देवता म्हणून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जरीआई-मरीआईला विज्ञानयुगात माणूस विसरला आहे. ...

कोेतूळ : महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या वेशीवर साथ रोगाची देवता म्हणून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जरीआई-मरीआईला विज्ञानयुगात माणूस विसरला आहे.

महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, दक्षिण भारत, पंजाब या राज्यांत मरीअम्मा, मारी, मरीमाय, मुक्ताई, रक्तादेवी, नांगरबाबा, खोकल्याई अशा दगडाच्या शेंदूर लावलेल्या देवता आहेत. पोतराज हे मरीआईचे उपासक जरीआई-मरीआई जरी म्हणजे तापाची मरी म्हणजे साथ रोगाची देवता मानली जाते.

१८९८ ते १९१९ पर्यंत महाराष्ट्रात प्लेग होता. तत्पूर्वी मानमोडी होती. यावेळी गावात पोतराज मरीआईचा गाडा घेऊन यायचे. शुक्रवार, मंगळवारी कडुनिंबाचा पाला, गोमूत्र टाकून गावातील महत्त्वाचे मार्ग शिंपीत जणू गावच सॅनिटाइझ करत होते, तर मांत्रिक छोट्या लाकडी नांगराने गावाभोवती पिठाने रेषा आखत. गावातून सव्वा महिना बाहेर न पडणे, घराबाहेरील अन्न न खाणे. म्हणजेच लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा हेतू असावा.

आजही आदिवासी व ग्रामीण भागात पावसाळ्यात साथीचे आजार येऊ नयेत म्हणून साथीला कोंबडे, बकरे कापतात. काही ठिकाणी आषाढात अशीच जत्रा, बगाड करून रोगराई गावाबाहेर नेली जाते. काही ठिकाणी या देवतांना लाकडी गाडे, नांगर अर्पण करायची पद्धत आहे.

आता कोरोना महामारीत ग्रामीण भागात ठाकर, वडार व काही भटके या देवतांची पूजा करतात. कालपरत्वे या विधीचा वापर अनेक भगत, देवलशांनी स्वार्थासाठी केल्याने यात अंधश्रद्धा व दुष्कृत्य आली. विशेष म्हणजे या देवतांच्या विधी आणि नियमावलीबाबत मराठी ज्ञानकोशातही व्याख्या असल्याने त्यांचे प्राचीनत्व, लोकविधीचा प्रवास सिद्ध होतो.

.....................

कोतूळ गावात माझ्या घरासमोर नांगरबाबा आहे. माझे आजोबा पन्नास वर्षांपूर्वी सांगायचे, एका देवलशाने गावाच्या कडेने छोट्या लाकडी नांगराने पिठाची सीमारेषा काढून प्लेगच्या साथ रोग काळात सव्वा महिना सीमाबंदी केली होती. गावात पाणी, गोमूत्र, लिंबाचा पाला टाकून सडा टाकत. खोकल्याची साथ आली तर गावाबाहेर खोकल्याईचे मंदिर आहे.

-सोपान घोलप, कोतूळ

..................

जुन्या चालीरीतीतील विधींमध्येही विज्ञान होते. आता लोक पोलिसांना घाबरतात, पूर्वी देवांना घाबरायचे म्हणून सगळे विधी चुकीचे म्हणता येणार नाहीत. लिंबाचा पाला व गोमूत्र ही जंतुनाशकेच आहेत. कुणाचे घरी खाऊ नका, हे वर्ज्य, तिथे जाऊ नका, सव्वा महिना वेस न ओलांडणे हे सर्व लाॅकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे प्रकार होते. यातही विज्ञान होतेच, फक्त आपण गैरफायदा घेतल्याने ती अंधश्रद्धा झाली.

-डाॅ. पांडुरंग बोरुटे, सेवानिवृत्त आरोग्य संचालक