शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

जीवे मारण्याचा प्रयत्न ; पाच वर्षे कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST

संगमनेर : दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ...

संगमनेर : दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ सप्टेंबर २०१८ ला निमगावजाळीत घडली होती. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता. वार करणाऱ्या तरुणाला येथील जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी पाच वर्षे कारावास तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर दोघांना निर्दोष मुक्त केले.

सतीश दशरथ आरगडे (वय ३४ वर्षे, रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजय ऊर्फ गणपत शिवाजी वदक आणि शोभा शिवाजी वदक अशी निर्दोष मुक्त केलेल्या दोघांची नावे आहेत. संभाजी सुखदेव आरगडे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली होती. २०१७ ला त्यांचे बंधू शिवाजी आरगडे यांनी सतीश आरगडे याच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. सतीश आरगडे हा त्यांच्याकडे वाढीव व्याजाची मागणी करत असताना त्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते.

त्यानंतर ५ सप्टेंबर २०१८ ला सकाळी साडेसातच्या सुमारास निमगावजाळी शिवारात सतीश आरगडे याने शिवाजी आरगडे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या शिवाजी आरगडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आश्वी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. त्यांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्ह्यात एकूण तेरा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. शुक्रवारी (दि. २४) न्यायाधीश घुमरे यांनी या गुन्ह्याचा निकाल देत आरोपी सतीश आरगडे याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून ॲड. बी. जी. कोल्हे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील सरोदे, पोलीस हेड कॉस्टेबल प्रवीण डावरे यांनी काम पाहिले.