शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’मधील १६८ भूखंडांचे वाटप रद्द

By admin | Updated: June 14, 2016 23:23 IST

अहमदनगर : नगर एमआयडीसीमधील तब्बल १६८ भूखंडांचे वाटप रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिला आहे.

अहमदनगर : नगर एमआयडीसीमधील तब्बल १६८ भूखंडांचे वाटप रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिला आहे. हे भूखंड आरक्षित असताना तत्कालीन मंत्र्यांनी त्यांचे बेकायदेशीरपणे वाटप केले, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार होती. या भूखंड वाटप प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
एमआयडीसीमध्ये एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के जागा ओपन स्पेससाठी आणि ५ टक्के जागा अ‍ॅमेनेटिजसाठी राखीव ठेवली होती. ती जमीन विकता येत नाही. मात्र, या राखीव क्षेत्रावरील १६८ भूखंडांचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे वाटप केले. सदरचे वाटप तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नियमित करून त्याबाबत आदेश काढले. या आदेशाविरुद्ध नगर येथील विष्णू जगन्नाथ ढवळे आणि रुपेश शिवाजी पानसंबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात १८ जुलै २०१३ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर अंतिम सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एस. एस. पाटील यांनी मंगळवारी वरील निकाल दिला असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात हा भूखंड घोटाळा मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता. घोटाळ््यात २०१३ मध्ये नगर येथील आमी संघटनेलाही प्रतिवादी करण्यात आले होते. याचिकाकर्ते यांच्यातर्फे अ‍ॅड. नितीन गवारे यांनी काम पाहिले. आमी संघटनेतर्फे अ‍ॅड. आर. एन. धोर्डे, उद्योजकांतर्फे अ‍ॅड. एस. एस. दंडे, सरकारतर्फे अ‍ॅड. यावलकर यांनी खंडपीठात बाजू मांडली. (प्रतिनिधी)