शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:22 IST

Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंह हे गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली या उमेदवारांचे अपहरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसे नेते सुमित वर्मा यांनी केला आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या राहुल जाधव यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा आणि अंबरनाथ भालसिंह यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे. केडगाव हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. याच भागातील हे दोन्ही उमेदवार अचानक गायब झाल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

दमदाटी आणि धमकावल्याचा आरोप

मनसे नेते सुमित वर्मा यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, "गेल्या दोन-तीन दिवसांपासून केडगाव परिसरात आमच्या उमेदवारांना निवडणूक न लढवण्यासाठी धमकावले जात होते. त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी वारंवार दमदाटी केली जात होती. आता त्यांचे अपहरण करून लोकशाहीचा गळा चेपण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे."

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या गंभीर प्रकारानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या उमेदवारांच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर उमेदवारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

लोकशाही धोक्यात?

निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांचे अशा प्रकारे गायब होणे, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हे अपहरण आहे की उमेदवारांनी स्वतःहून माघार घेण्यासाठी हा मार्ग निवडला आहे, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. मात्र, या घटनेमुळे केडगाव परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ahilyanagar: MNS alleges kidnapping of two candidates before election.

Web Summary : Amidst Ahilyanagar elections, MNS alleges two candidates were kidnapped by ruling parties to ensure unopposed victories. Police complaint filed, investigation underway.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ahilyanagar Municipal Corporation Electionअहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक २०२६MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६