शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात हॉटेल्सना ३०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST

अहमदनगर : कोरोनामुळे नगर शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉक करण्याची वेळ आली आहे. सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे मागील १६ महिन्यांत ...

अहमदनगर : कोरोनामुळे नगर शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉक करण्याची वेळ आली आहे. सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे मागील १६ महिन्यांत हॉटेल व्यवसायाला सुमारे ३०० कोटींहून अधिकचा फटका बसल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यवसायाचा आर्थिक कणा मोडला असून, हॉटेल व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे.

औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कल्याण, मनमाड असे महामार्ग नगर शहरातून जातात. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी जेवणासाठी नगर शहर व परिसरातील हॉटेल्समध्ये थांबतात. त्यामुळे येथील हॉटेल्समध्ये रेलचेल असते. मात्र कोरोनाचा संसर्ग व त्यानंतर लागलेला लॉकडाऊन यामुळे हॉटेल्स व्यवसाय मोडून पडला आहे. हाॅटेल व्यवसाय केवळ निवास आणि भोजनाची सुविधा एवढ्यापुरताच मर्यादित नसून, अन्य ५० हून अधिक व्यवसायांशी जोडलेला आहे. दूध, भाजीपाला, बेकरी उत्पादनांवरही याचा परिणाम झाला आहे. शहरात मोठी दहा हॉटेल्स आहेत. त्यांची प्रत्येकाची वार्षिक उलाढाल सरासरी १५ कोटींच्या घरात आहे. रेस्टॉरंट, बार, शाकाहारी, मांसाहारी जेवणाची लहान-मोठी पाचशेहून अधिक हॉटेल्स आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींहून अधिक आहे. हाॅटेल्स व्यवसायातील उलाढाल मोठी असली तरी गुंतवणूकही मोठी आहे.

सध्या दुपारी चारपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच पार्सल सुविधा पुरविण्यासही परवानगी आहे. परंतु, दिवसभर व्यवसाय होत नाही. ग्राहक रात्रीच्या वेळी जेवणासाठी येतात. पण, रात्री हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. हॉटेलचा परिसर मोठा आहे. रात्रीच्या वेळी नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवणे व्यावसायिकांना शक्य आहे. वेळोवेळी मागणी करून रात्री हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे कामगारांचा पगार, वीज बिल, साफसफाई हा सर्व खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न सध्या हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे.

....

पूर्ण क्षमतेने परवानगी द्या

सध्या अनलॉक काळात दुपारी ४ वाजेनंतर हॉटेलमध्ये बसणे बंद होते व पार्सल सुविधा सुरू होते. येथील हॉटेलचा ६० टक्के व्यवसाय हा सायंकाळनंतरच होतो. हा ६० टक्के व्यवसाय बुडाल्याने हॉटेल उद्योग कोलमडला आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल पूर्ण क्षमतेने चालविण्यास परवानगी दिली तरच हा व्यवसाय तग धरू शकेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

...

तीन हजार कर्मचारी बसले घरी

सध्या हॉटेल्स निम्म्याच क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे कामगार संख्येवरही गदा आली आहे. आजघडीला तीन हजारांहून अधिक कामगार घरी बसून आहेत. व्यावसायिक उत्पन्न बंद आहे. पण, देखभाल-दुरुस्तीचा खर्च, व्यवसाय कर, वीज बिल, मालमत्ता कर, कर्मचाऱ्यांचे पगार सुरूच आहेत.

....

जिल्हा प्रशासनाने दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल्सना परवानगी दिलेली आहे. परंतु, ६० टक्के व्यवसाय रात्रीच होतो. दिवसभर परवानगी मिळते; मग रात्रीच्या वेळी कोरोना येतो का? रात्री हॉटेल्स सुरू ठेवल्याने संसर्ग वाढणार आहे का? प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. बँकांचे हप्ते सुरू आहेत. तसेच कामगारांचे पगार, वीज बिल यासह अन्य खर्च आहे. तो भागवायचा कसा, असा प्रश्न आहे.

- सुनील काळे, हॉटेल व्यावसायिक

.....

मागण्या

१) पूर्ण क्षमतेने हॉटेल उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे

२) रात्री १० वाजेपर्यंत हॉटेलमध्ये जेवणास परवानगी द्यावी

३) बँकेतून जे कर्ज काढले आहे, त्या कर्जाऊ रकमेच्या हप्त्याची परतफेड करण्यास वर्षभरासाठी स्थगिती मिळावी

४) जीएसटीमधून सवलत मिळावी

.....

सूचना : फोटो ३० हॉटेल नावाने आहे.