शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मार्गदर्शक

By admin | Updated: August 12, 2016 13:22 IST

झोपेतून उठलेल्या भगवान श्रीकृष्णाचे लक्ष त्याच्या पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे प्रथम जाते. नंतर त्याच्या उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे जाते.

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
झोपेतून उठलेल्या भगवान श्रीकृष्णाचे लक्ष त्याच्या पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे प्रथम जाते. नंतर त्याच्या उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे जाते. तेव्हा दुर्योधन श्रीकृष्णाकडे सर्व सैन्याची मागणी करतो. ‘तथास्तु’ म्हणून श्रीकृष्ण त्यास होकार देतो. प्रचंड सैन्यप्राप्तीमुळे दुर्योधन खूप आनंदी होतो. सारे काही मिळाल्याने युद्धात विजयी झाल्याचा ‘उन्मादी’ आनंद युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्याला होतो.
नंतर अर्जुन श्रीकृष्णास आर्जवी नम्र स्वरांत विनंती करतो. ‘भगवान !, या युद्धात तुम्ही माझे मार्गदर्शक म्हणून रहा.’ ‘तथास्तु’ म्हणून श्रीकृष्ण मान्यता देतात. तेव्हा दुर्योधन अर्जुनास म्हणतो, ‘अरे अर्जुना, तुझ्या वाट्याला फक्त कृष्णच ! पण माझ्या वाट्याला बघ केवढे प्रचंड सैन्य !’ असे म्हणून तो उपहासाने हसतो.
महाभारतातील ही गोष्ट सर्व परिचित आहे. महाभारतात दुर्योधनासह प्रचंड फौज कशी पराभूत झाली आणि अर्जुन कसा विजयी झाला हे सर्वज्ञात आहे. अर्जुनाच्या विजयामागे त्याचा ‘कर्मयोग’ तर आहेच. पण त्याच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे ‘मार्गदर्शन’ महत्त्वाचे आहे. त्या युद्धात श्रीकृष्ण योग्य दिशेने रथ नेत होता. अर्जुनाला सुयोग्य मार्गदर्शन करीत होता. त्याच्या मनात लढण्याची, योग्य-अयोग्य काय याची बिजे पेरीत होता. श्रीमद्भगवतगीतेत श्रीकृष्णाच्या मार्गदर्शक भूमिकेचे सर्व तत्त्वज्ञान व्यापक प्रमाणात आले आहे.
काल-मान-परिस्थिती कितीही बदलली तरीही ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’सारखी मूल्ये चिरंतन असतात. उत्तम मार्गदर्शक व्यक्ती, कुटुंब, समाज, आजूबाजूचा भवताल सकारात्मक स्वरूपात बदलू शकतो, घडवू शकतो. विविध क्षेत्रात नावलौकिक, उत्तुंग यश मिळविणाऱ्या व्यक्तींनी ‘मार्गदर्शका’चे महत्त्व मान्य केले आहे. म्हणूनच मार्गदर्शकाची गरज आहे.