शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : प्रशासनाला हवे गोदाम, पावसाळा तोंडावर तरी हरभरा घरातच

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शेतकऱ्याच्या कापूस व तूर खरेदीच्या अडचणीनंतर आता हरभरा खरेदीचा विषय गंभीर झाला आहे. पावसाळा तोंडावर असतानाही रबी हंगामात निघालेले हरभऱ्याचे पीक अजूनही घरात पडून आहे. शासन हरभरा खरेदी कधी सुरू करते, त्यांना मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले. मात्र शासनाने हमी भावात हरभरा खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात हरभरा विकावा लागत आहे. चार हजार ७०० रुपये हरभऱ्याचा आधारभूत भाव आहे. मात्र पैशांची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांना तो तीन ते साडेतीन हजारातच खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शासन व व्यापारी शेतकऱ्यांच्या पाटावर व पाठीवर असे दोनही बाजूने मारण्याचे काम सुरू आहे. गोडावून उपलब्ध नसल्याच्या कारणावरून हरभरा खरेदी होवू शकले नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी धामणगाव येथील गोडावून आरक्षित केले आहे. आता त्या गोडावूनमध्ये रासायनिक खताचा साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गोडावूनचा अजूनही जिल्ह्याला ताबा मिळालेला नाही. तो कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गोदामांअभावी थांबली हरभरा खरेदी : व्हीसीएमएसगोडावून उपलब्ध नसल्यामुळे हरभरा खरेदी थांबली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवरच माहिती देण्यात आली आहे. लवकर हरभरा खरेदी सुरू होईल, अशी माहिती ‘व्हीसीएमएस’चे जिल्हा व्यवस्थापक अमोल राजगुरे यांनी दिली.शेतकरी संघर्ष समिती आक्रमकशेतकरी अनेक अडचणीत अडकला आहे. यात हरभरा खरेदीस दिरंगाई करून तो पुन्हा पिचला जाणार आहे. त्यामुळे हरभरा खरेदी तत्काळ व्हावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, अशोक गोबरे, वसंत घुईखेडकर, नानाभाऊ गाडबैले, सुरेश चिंचोळकर, बालू पाटील दरणे, दिनेश गोगरकर, आनंदराव जगताप, घनश्याम दरणे, जयंत घोगे, अनिल गायकवाड आदींनी केली. लवकर हरभरा खरेदी करून त्याचा मोबदला शेतकºयांना द्यावा, खरिपाच्या बी-बियाणे खरेदीसाठी तो पैसा कामात येईल, असे निवेदनात नमूद आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी