शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देनऊ टँकर, २०० विहिरी : दीड लाख नागरिकांना चटके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर पडण्याआधीच जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. सुमारे दीड लाख लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तूर्तास जिल्ह्यात नऊ टँकर सुरू करण्यात आले असून १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. कोरोनाशी दोन हात करीत असताना जनतेला पाणी समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यात महिलांची फरपट होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी तूर्तास नऊ टँकर सुरू केले. त्यात पुसद तालुक्यातील लोहरा (खुर्द), लोहरा (ईजारा), बुटी (ई), आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, पाळोदी, चिमटा, घाटंजीतील ससानी आणि यवतमाळ तालुक्यातील इचोरी व जांभुळणी येथे टँंकर सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी १४ मेपर्यंत जिल्ह्यात २३ टँकर सुरू होते.याशिवाय प्रशासनाने १३२ गावांमध्ये १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात आर्णी तालुक्यातील १९, महागाव ३९, घाटंजी चार, दिग्रस १६, पुसद २, उमरखेड ३०, वणी ३, यवतमाळ १३, दारव्हा १, केळापूर २ आणि झरी जामणी तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १९८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. १३२ खासगी विहिरी अधिग्रहित करून एक लाख ३३ हजार २१८ नागरिकांची तहान भागविली जात आहे. टँकरद्वारे नऊ गावातील आठ हजार १४ लोकांना पाणी पुरविले जात आहे.महिलांना करावी लागते पायपीटपाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. टँकर सुरू असलेल्या काही गावांमध्ये टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. पुसद तालुक्यातील माळपठार पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. या परिसरातील लोहरा (खुर्द) येथे एकाच विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात