शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

वणी बस आगाराला स्वच्छतेचा विटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 6:00 AM

या आगाराने २०१८ मध्ये ८९ लाख ७५ हजार ४६७ रूपये दिले होते, तर २०१९ मध्ये आतापर्यंत ४७ लाख ४६ हजार ३३० रूपये उत्पन्न दिले आहेत. या आगारात ५० पेक्षा अधिक बसेस असून १०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आगार परिसरात विश्रामगृह बांधले आहे. मात्र तेथे प्रचंड असुविधा आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात । प्रसाधनगृह दुर्लक्षीत, विश्रामगृहाला झुडूपांचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : देशभरात स्वच्छ भारतचा नारा दिला जात असताना दुसरीकडे वणी आगाराने मात्र स्वच्छतेच्या विषयात विटाळ पाळला आहे. आगारात कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था बकाल झाली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. विश्रामगृहदेखील दुर्लक्षित असून या परिसरात झुडूपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून वणी आगाराची ओळख आहे. या आगाराने २०१८ मध्ये ८९ लाख ७५ हजार ४६७ रूपये दिले होते, तर २०१९ मध्ये आतापर्यंत ४७ लाख ४६ हजार ३३० रूपये उत्पन्न दिले आहेत. या आगारात ५० पेक्षा अधिक बसेस असून १०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आगार परिसरात विश्रामगृह बांधले आहे. मात्र तेथे प्रचंड असुविधा आहे. या विश्रामगृहात मुक्कामाने थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. झोपण्यासाठीदेखील आवश्यक ती व्यवस्था याठिकाणी नाही. उन्हाळ्यात तर येथे कुलर किंवा थंड पाणीदेखील मिळत नाही. सन २००० मध्ये या विश्रामगृहाला लागूनच प्रसाधनगृह बांधण्यात आले. मात्र प्रसाधनगृहाची प्रचंड तुटफूट झाली असून त्यामुळे याठिकाणी कायम घाणीचे साम्राज्य असते. प्रसाधनगृहात जाणाºया कर्मचाºयांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.आगार व्यवस्थापक कार्यालयासमोरदेखील प्रसाधनगृह असून त्याची अवस्थादेखील बिकट झाली आहे. प्रसाधनगृह वापरण्यालायक नसल्याने कर्मचाऱ्यांना उघड्यावरच नैसर्गीक विधी उरकावा लागत आहे. विशेष म्हणजे याच आगार परिसरातून केंद्र सरकारच्या स्वच्छता विषयक योजनेचा अनेकदा गवगवा केला जातो. परंतु खुद्द वणी आगाराच घाणीच्या विळख्यात सापडला आहे. आगार परिसर स्वच्छ राहावा, यासाठी एका कंपनीला कंत्राट दिले असून त्यापोटी या कंपनीला एस.टी. महामंडळाकडून दरमहा लाखो रूपये अदा केले जातात.वणी आगारात स्वच्छता ठेवण्यासाठी पाच ते सहा कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु स्वच्छतेची समस्या मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रसाधनृहात प्रचंड तुटफूट झाल्याने घाण तुंबत आहे. त्यामुळे कितीही स्वच्छता केली तरी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदर गंभीर परिस्थिती असतानाही या स्वच्छतागृहांची दुरूस्ती करण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे वणी आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.कर्मचारी संघटनेची समस्येकडे डोळेझाककर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्मचारी संघटना कार्यरत आहे. मात्र वणी आगारातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसाधनगृह व विश्रामगृहाची दुरावस्थेकडे कर्मचारी संघटनेचेदेखील डोळेझाक होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आता संघटनेनेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :state transportएसटी