शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी तालुक्यात संततधार

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे.

वणी : गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे. या संततधार पावसाने या चारही तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्पही प्रथमताच भरले आहेत. यावर्षी सुरूवातीच्या मृग नक्षत्रापासून पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत आणि कोरड्या दुष्काळात सापडले. कपाशीची वाढच खुंटल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. या कोरड्या दुष्काळातच यंदा शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी कपाशीची सीतादही करीत होते. व्यापारीही त्याचवेळी कापूस खरेदी सुरु करीत होते. मात्र यावर्षी दसऱ्याला कापूस निघणे अवघड झाले आहे.अत्यंत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना पोळ्याच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पोळ्याच्या दिवशी सोमवारी सायंकाळी हजेरी लावली. त्यानंतर गेले चार दिवस सतत पाऊस कोसळत आहे. शनिवारी आणि रविवारी तर दमदार पाऊस झाला. वणी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल ८0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर रविवार सकाळपासून आज सोमवार सकाळपर्यंत पुन्हा ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वणी तालुक्यात यावर्षी आजपर्यंत ५८३ मिलीमीटर पऊस झाला. मागीलवर्षी याच काळात तब्बल एक हजार ३५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, हे विशेष.पोळ्यापासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांना लाभ झाला आहे. मात्र कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशीचे पीक अद्याप संकटात आहे. शेतकऱ्यांची आशा सोयाबिनवर टिकून आहे. दरवर्षी दसऱ्यापासून कापूस वेचणीला सुरूवात होते. सीतादहीचा कापूस उच्च प्रतीचा असल्याने त्याला दरही चांगले मिळतात. त्यातूनच शेतकरी दसरा, दिवाळी सण साजरे करतात. तथापि यावर्षी पावसाच्या विलंबाने विजयादशमीला सीतादही होणे अवघड झाले आहे. पावसाच्या दडीने उत्पन्नातही घट येण्याची शक्यता कायमच आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्प भरले. मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प आणि पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण भरले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)