शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अव्वाच्या सव्वा वीजबिलाच्या दोन हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:00 AM

२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.

ठळक मुद्देमहावितरणची सारवासारव : यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसदमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे बिल एकाच वेळेस पाठविले. या बिलामध्ये विजेचे वाढीव युनिट दर लागून आले. यामुळे ग्राहकांना जबर शॉक बसला आहे. यवतमाळ, पांढरकवडा या दोन विभागातून दोन हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुसदचा आकडा आणखी मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.या बिलामध्ये वीज कंपनीच्या वाढीव रिडींग युनिटचा समावेश आहे. याशिवाय सर्व युनिट एकत्र झाल्याने त्याचे बिल वाढून आले, असा आरोप करीत ग्राहकांनी वीज कंपनी कार्यालयावर गत आठ ते दहा दिवसांपासून गराडा घातला आहे. दररोज शेकडो तक्रारी वीज कंपनी कार्यालयाकडे येत आहे. जे बिल ५०० ते हजार रुपयाचे होते, ते बिल ग्राहकांना आठ ते दहा हजारांच्या घरात मिळाले आहे.वीज बिलाच्या वाढीव दराने सर्वसामान्य ग्राहक चकित झाले आहे. यातून त्यांनी वीज कंपनी गाठत बिल दुरुस्त करण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. कंपनीने ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेत कुठलेही बिल रिडींग पेक्षा जास्त नाही हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिल कमी होणार नाही, मात्र बिलाचे एकूण मूल्य दोन हप्त्यात विभागून देण्याबाबत कंपनी तयार आहे. प्रत्यक्षात ग्राहकाने ही वीज वापरली नव्हती, असे म्हणत ग्राहकांनी आम्हाला वाढीव बिल थोपविण्यात आल्याचा आरोप केला आहे.कोरोना काळात गर्दी नियंत्रित करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र वीज कंपनी कार्यालयात एक खिडकी योजनेने प्रचंड गर्दी वाढली आहे.यातून कोरोना सारखा आजार पसरण्याचाही धोका आहे. कंपनीने ग्राहकांना सुविधा मिळावी यासाठी तक्रार जाणून घेण्याच्या जादा खिडक्या उघडाव्या अशी मागणी ग्राहक करीत आहे. वीज कंपनी यावर काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :electricityवीज