शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:23 PM

गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, ...

ठळक मुद्देमदन येरावार : कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन, ४० हजार पदवीधर शेतकऱ्यांच्या बांधावर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. समता मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून सहपालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, आत्माचे संचालक दत्तात्रय काळे, डॉ. प्रमोद यादगिरवार उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहे. आजपर्यंतच्या सर्व उणीवा दूर करण्यासाठी काम करीत आहे. तत्कालीन सरकारमधील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केलेले पॅकेज आमच्या सरकारने पूर्ण केले. विजेचा बॅकलॉग पूर्ण करून नवीन केंद्र उभारले जात आहे. मुबलक पाणी आणि मुुबलक वीज असेल तर शेतकºयांची प्रगती थांबविता येणार नाही.त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला वीेज देण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. साडेसहा हजार शेततळे पूर्ण केले आहेत. पुढे शेततळे निर्माण केले जाणार आहे.सहपालकमंत्री संजय राठोड म्हणाले, पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन काम करणे काळाची गरज आहे. हे तंत्रज्ञान शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी केले.सूत्रसंचलन कैलास राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी मानले.शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान मिळावे आणि ते समजावे म्हणून कृषी पदवी घेतलेले ४० हजार पदवीधर आणि विद्यार्थी शेतकºयांच्या बांधावर पोहचतील.शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील. त्यांना मार्गदर्शन करतील, असे सूतोवाच पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. कृषी विद्यालयाला स्टाफ देण्याची कारवाई पूर्ण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी बचतगट आणि महिला बचतगटातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.