शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

पुसद शहरात वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:40 AM

पुसद : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली ...

पुसद : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरामधील मुख्य बाजारपेठेमधील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नेहमीच पाहावयास मिळत आहे. शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

शहरातील वाहतुकीचे प्रमुख रस्ते असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक, सुभाष चौक या मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतुकीस व रहदारीला अडथळा येत आहे. सामान्य नागरिक, अबालवृद्ध, महिला, शाळकरी मुली आदींना या मार्गावरून पायी चालणे, दुचाकी चालविणे अत्यंत अवघड झाले आहे. दररोज किरकोळ अपघात घडत आहे.

या रस्त्यावर नगरपरिषदेने खोदकाम व बांधकाम करून ठेवलेले आहे. त्यामुळे फुटपाथवर व्यवसाय करणारे, भाजीपाला, फळे विकणारे यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. वास्तविक आता एका बाजूने जाणे व एका बाजूने येणे, अशा रस्त्याचे तेथे प्रयोजन आहे. परंतु दोन्ही बाजूला भाजीपाला, फळे विकणाऱ्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी नेहमीच ग्राहक, दुुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने उभी करतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.

वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी संपवण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, सुभाष चौक या परिसरात कायम वाहतूक शिपायाची नेमणूक व्हावी, अशी शहरातील जनतेची मागणी आहे.