शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

परंपरागत शेतीत बदल आवश्यक

By admin | Published: August 30, 2015 2:15 AM

शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे,....

राजीव शेट्टी : अंबोडा येथे शेतकरी मेळावा, शेताची प्रत्यक्ष पाहणीमहागाव : शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजीव शेट्टी यांनी केले. अंबोडा येथील गजानन महाराज संस्थानच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘अमृत पॅर्टन’ पुस्तकाचे प्रकाशन खासदार शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार शेट्टी पुढे म्हणाले, पुर्वी शेतीसाठी आर्थिक उलाढालीचे केंद्र हे त्या-त्या गावच्या सोसायट्या होते. जिल्हा मध्यवर्ती बँका त्यासाठी कर्ज पुरवठा करीत होत्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीची बलस्थाने पांढरपेशांनी घेरली. शेतकऱ्यांच्या बँका असलेल्या संस्थेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांना सावकार आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात जावे लागत आहे. कधी बँका तर कधी सावकार शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकार वाढीस लागले. शासनाला शेतकरी आत्महत्येचे मुळ शोधण्यास बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनांनी एकत्र लढा उभारण्याची गरज शेट्टी यांनी व्यक्त केली. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. पंडित चव्हाण, जगदीश नरवाडे, मनीष जाधव, प्रकाश कोपरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नागोराव कदम, प्रकाश इंगोले, अमृतराव देशमुख, डॉ. संदीप शिंदे, हनवंतराव देशमुख, दादाराव ठाकरे, अविनाश पतंगराव, एम.डी. मिराशे, शंकरराव राजेगोरे, हरिभाऊ कुंडेकर, गुलाब शेतीच्या महिला शेतकरी लक्ष्मीबाई पारवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)