रुग्णांच्या नातेवाईकांना स्वामीभोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:07+5:30
स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेतर्फे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी श्री स्वामींची सामूहिक उपासना केली जाते. प्रत्येक उपासनेच्यावेळी एक नवीन संकल्प केला जातो. प्रत्येक माणसाचे आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, प्रगती, आनंदी व सुखासाठी सोबतच गुरूबळ वाढविण्यासाठी ही संकल्पना करण्यात येते. या उपासनेत विविध समाजोपयोगी संकल्प घेऊन तसे कार्य केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गरीब आणि गरजू उपाशी राहू नये यासाठी स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेने स्वामीभोज अन्नदान सेवा सुरू केली आहे. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्या रुग्णांसोबतच्या १५० नातेवाईकांना या संस्थेतर्फे जेवणाचा मोफत डबा दिला जाणार आहे. प्रत्येक रविवारी रात्री ८ वाजता या संस्थेचे सर्व साथी एकत्र येऊन अन्नदान करणार आहेत. या सेवेचा शुभारंभ अलीकडेच करण्यात आला.
स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेतर्फे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी श्री स्वामींची सामूहिक उपासना केली जाते. प्रत्येक उपासनेच्यावेळी एक नवीन संकल्प केला जातो. प्रत्येक माणसाचे आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, प्रगती, आनंदी व सुखासाठी सोबतच गुरूबळ वाढविण्यासाठी ही संकल्पना करण्यात येते. या उपासनेत विविध समाजोपयोगी संकल्प घेऊन तसे कार्य केले जाते. त्यातीलच एक म्हणजे, रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान होय.
सामूहिक उपासना व संबंधित सर्व कार्यासाठी संस्थेचे संतोष सांबजवार, अनिल वटे, अमोल तंबाके, प्रकल्प प्रमुख विवेक औशल, प्रतीक बोटुले, उमेश श्रीवास, आनंद दर्डा, चैतन्य थथ्थे, अनिल लोहकरे, देवेंद्र गोडे, रणजित वनकर, ओम व स्वामी सांबजवार, नीलेश येवले, गजानन श्रीरामजवार, रवी सिंगवी, राजेश व अमेय सांबजवार, श्रीकांत मस्के, योगेश मस्के, नरेंद्र कुरवाडे, प्रकाश गुरुनुले, सचिन राठोड, सुनील वाट, मनिष सावला, संकेत मस्के, किशोर गुप्ता, शुभम कत्रजवार, रूपेश श्रीवास, रेणू व दिव्या संदीप गुल्हाने, सौरभ बढिये, लक्ष्मी माने, प्रवीण शेंडे, रितेश राय, शुभम पाळद, डॉ. अरविंद कुडमेथे आदींनी अन्नदानासाठी पुढाकार घेतला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांचे सहकार्य लाभले.