शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून जंगल संरक्षण!

By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST

जिल्हा आणि तालुका मुख्यालयी राहून वन अधिकारी-कर्मचारी जंगलांचे संरक्षण करीत आहेत. कित्येक अधिकाऱ्यांनी तर अनेक महिन्यांपासून जंगलात पायसुद्धा ठेवलेला नाही.

वन प्रशासन मेहेरबान : सागवानतोड नित्याचीच, शिकारीत वाढ यवतमाळ : जिल्हा आणि तालुका मुख्यालयी राहून वन अधिकारी-कर्मचारी जंगलांचे संरक्षण करीत आहेत. कित्येक अधिकाऱ्यांनी तर अनेक महिन्यांपासून जंगलात पायसुद्धा ठेवलेला नाही. पर्यायाने यवतमाळ वनवृत्तात जंगल तोड प्रचंड वाढली आहे. वनपाल, वनरक्षकांचे नुकतेच काम बंद आंदोलन झाले. आंदोलनाचा समारोप झाला मात्र पदरी काहीही पडले नाही. आंदोलनाच्या वेळी वन कर्मचारी संपावर असल्याने तस्कर जंगलात शिरतील, वृक्षतोड वाढेल, शिकारी वाढतील, असे चित्र निर्माण केले गेले. वनपालांच्या संपाची दखल घ्यावी हा यामागे उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात सरकारने हा संप गांभीर्याने घेतला नाही. संप काळात शिकारी वाढतील, असा दावा करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी ते ड्युटीवर असताना शिकारी का होतात, वृक्षतोड कशी होते याचे उत्तर द्यावे, असा सूर ऐकायला मिळत आहे. त्यात वास्तवही आहे. कारण आजच्या घडीला वन खात्याचे बहुतांश अधिकारी, कर्मचारी जिल्हा वा तालुका मुख्यालयी राहूनच जंगल संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असल्याचे विसंगत चित्र पहायला मिळत आहे. काही प्रामाणिक कर्मचारी याला अपवाद आहेत. मात्र त्यांची संख्या अगदीच नगन्य आहे. एकट्या यवतमाळ वनवृत्ताचा विचार केला तरी वनखात्याच्या रामभरोसे कारभाराची कल्पना येते. वनवृत्तात यवतमाळ, अकोला, वाशिम हे तीन जिल्हे येतात. बहुतांश जंगल हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, पांढरकवडा व यवतमाळ वन विभागांतर्गत येते. या जंगलांमध्ये सर्रास वृक्षतोड सुरू आहे. वन कर्मचारी शहरात वास्तव्याला असतात, कधी काळी चुकून जंगलातील कार्यालयात काही मिनिटांसाठी हात लावून आल्यासारखी भेट देतात, अधिकारी तर महिनोगिणती जंगलाकडे फिरकत नाहीत याची जाणीव सागवान तस्करांना आहे. सागवानाची तोड झाली तरी ती महिना-दोन महिनांनी उघड होते कारण वनकर्मचारी जंगलात जातच नाहीत. वन खात्याची ही इत्यंभूत माहिती असल्याने सागवान तस्कर, शिकारी सक्रिय आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या वनपरिक्षेत्रात वृक्षतोड केली जाते. स्वत:हून विशेष प्रयत्न करून वृक्षतोड थांबविल्याचे, सागवान चोरांना पकडल्याचे वृत्त नाही. पूर्वी किमान चौकीदार तरी जंगलात रहायचे. मात्र आता शासनाने त्यांना नोकरीत कायम केल्याने त्यांचाही जंगल संरक्षणातील इन्टरेस्ट संपला आहे. तेही आरएफओ, वनपालांप्रमाणे शहरात राहून जंगलांचे संरक्षण करू लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही मार्गावर गेले तरी रस्त्याच्या बाजूला सागवानाची मोठ्ठाली वृक्षे दिसून पडतात. मात्र थोडे जरी आत जंगलात गेले तरी अवैध वृक्षतोडीचा नजारा उघड होतो. अनेक ठिकाणी वन यंत्रणेची तस्करांशी असलेली मिलीभगतही या वृक्षतोडीला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते. त्यासाठी वेळप्रसंगी राजकीय नेत्यांमार्फत रॉयल्टीही भरली जाते. यवतमाळ वनवृत्ताची नव्याने रचना केली गेली. तालुकानिहाय नवे परिक्षेत्र तयार केले गेले. मात्र त्यानंतरही वृक्षतोड व शिकारीची अवस्था जैसे थे आहे. वन खात्याचा जोर हा सिंचन तलावावरच अधिक असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी कागदोपत्री तलाव दाखवून पैसा उचलला जातो. जंगलात चार ते पाच किलोमीटरवर तलाव अपेक्षित असताना उमरसरा परिसरात ठिकठिकाणी तलाव खोदले गेले आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून चांगली कामे हाती घेणे अपेक्षित असताना राजकीय कार्यकर्त्यांच्या सोईसाठी आणि वन प्रशासनाच्या ‘मार्जीन’साठी तलावांवर बहुतांश पैसा खर्च केला जातो. ३३ टक्के क्षेत्र वनांखाली आणण्याचे धोरण असताना वृक्ष लागवडीसाठी, ते जगविण्यासाठी वन खात्याकडून जनजागृती व प्रयत्न होताना दिसत नाही. या उलट कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवून निधी हडपण्यावर अधिक भर राहत असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)