शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

पोलिसांच्या वॉरंट प्रवास विम्याला संरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:13 PM

शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे.

ठळक मुद्देदावा करू शकणार नाही‘एसटी’ला साहाय्यता निधी नाही

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे. शिवाय पोलीस विभागाकडूनही यासाठी ठोस असे प्रयत्न झाले नाही. या व्यवहाराविषयी पोलिसांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.पोलिसांना शासकीय कामानिमित्तचा प्रवास ‘एसटी’नेच करावा लागतो. आरोपींना न्यायालयात घेऊन जाणे, मेडिकल, प्रशिक्षण, आरोपींचा शोध या कामांसाठी हा प्रवास घडतो. यासाठी पोलिसांच्या हाती रोख रक्कम दिली जात नाही. वॉरंट अर्थात कॅशलेस व्यवहार. पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे. एखाद्या पोलिसाचे नाव आणि सोबत असलेल्या इतर व्यक्तींची संख्या वॉरंटवर लिहायची (अशोक + पाच) अर्थात सहा प्रवासी. वॉरंट दाखविला की, तिकीट फाटले आणि ते प्रवासी झाले.मात्र ‘एसटी’ महामंडळाने सुरू केलेल्या ‘हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी’ योजनेत वॉरंटच्या प्रवाशाला दूर ठेवले गेले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक तिकीटामागे प्रवास भाड्याव्यतिरिक्त एक रुपया अधिक घेतला जातो.प्रवास भाड्याचे शंभर रुपये आणि एक रुपया अपघात सहायता निधी असे एकूण १०१ रुपयांचे तिकीट प्रवाशाला दिले जाते. बसला अपघात होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये त्याच्या कुटुंबाला महामंडळाकडून दिले जाते. मात्र यापासून वॉरंटवर प्रवास करणारे दूर ठेवण्यात आले आहे.वॉरंटवर अपघात सहायता निधीची रक्कम नोंद केली जात नाही. पाच व्यक्तींची नोंद असल्यास प्रती प्रवासी १०० रुपये या प्रमाणे ५०० रुपयांचेच वॉरंट पास केले जाते. त्यावर पाच प्रवाशांमागे सहायता निधी घेतला जात नाही. निधीच घेतला जात नाही तर अपघात विम्याचे संरक्षण द्यायचे कसे, हा एसटीचा प्रश्न आहे. सरकारी कामासाठी प्रवास करीत असताना विमा संरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार पोलिसांना चांगलाच खटकला आहे. लोकवाहिनीकडून सर्व प्रवाशांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

‘शिवशाही’तही जागा नाहीवॉरंटवर प्रवास करणाऱ्यांना ‘शिवशाही’तही जागा दिली जात नाही. वास्तविक जेवढे तिकीट असेल तेवढे तिकीट वॉरंटवर घेता येते. परंतु शिवशाहीने वॉरंट स्वीकारणार नाही, असा जणू पणच केला आहे. शिवशाही सुरू केल्याने महामंडळाने लांबपल्ल्याच्या इतर बसेस बंद केल्या आहे. फेऱ्या कमी झाल्याने वॉरंटने प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागते. शिवशाही नेमक्या प्रवाशांना घेऊन जाते. पोलीस अधिकारी, कर्मचारी हतबल होऊन बसकडे पाहत उभे राहतात. ही गैरसोय पोलीस विभागाकडूनही दुर्लक्षित आहे.

टॅग्स :Policeपोलिस