हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे. ...
जिल्हा बँक नोकरभरतीत समांतर आरक्षण लागू नसल्याच्या मुद्यावर पुसद विभागातील दिव्यांग व अन्य एकाने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुरुवातीला या मुद्यावर अंतरिम स्थगनादेश दिला गेला. मात्र शासनाचे उत्तर सादर झाल्यानंतर याच नव्हे तर यापूर्व ...
सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ...
सर्वात जुने नगर असलेल्या या भागातील काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले. काही ठिकाणी अद्याप रस्ते झाले नाही. सध्या जुने सिमेंट रस्तेही अनेक ठिकाणी फुटलेले आहे. फुटलेले सिमेंट रस्ते व कच्चे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे या भागातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिका ...
एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील सचिन ढोले व अमरावती येथील अनिल आढे या दोन आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर ‘महाराष्ट्र आरोग्यसेवक’ या व्ह ...
शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आईला दोन दिवसापूर्वी निमोनिया झाला असून चुकीच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला थेट अतिदक्षता कक्षात ठेवले. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. केवळ डॉ. शेख शब्बीर यांनी चुकीचा उपचार केल्याने ...
तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ ...
रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगित ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आ ...