शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नेर तालुक्यात रानडुकरांच्या हैदोसाने पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM

शिरसगाव येथील राहुल खडसे या शेतकऱ्याने दोन एकर शेतात भाजीपाला शेती सुरू केली आहे. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकवून तो आपल्या कुटुंबाची गुजरान करतो. यावर्षीसुद्धा त्याने सोयाबीन या पारंपरिक पिकाला बगल देत वांगे, भेंडी, गवार, बरबटी यासारखा भाजीपाला शेतात लावला. मेहनतीला रंगही आला. भाजीपाला पीक बहरत असतानाच एका रात्री रानडुकराने संपूर्ण भाजीपाला पीकच उद्ध्वस्त केले.

ठळक मुद्देहल्ल्यात जीवितालाही धोका : शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड, अनेकांनी बदलविली पीक पद्धती

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना करत यावर्षीच्या खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिकलेला माल बाजारात विकण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वाधिक संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल करत भाजीपाल्याची लागवड केली. मात्र रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. पीक वाचवावे कसे या विवंचनेत शेतकरी आहे.शिरसगाव येथील राहुल खडसे या शेतकऱ्याने दोन एकर शेतात भाजीपाला शेती सुरू केली आहे. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकवून तो आपल्या कुटुंबाची गुजरान करतो. यावर्षीसुद्धा त्याने सोयाबीन या पारंपरिक पिकाला बगल देत वांगे, भेंडी, गवार, बरबटी यासारखा भाजीपाला शेतात लावला. मेहनतीला रंगही आला. भाजीपाला पीक बहरत असतानाच एका रात्री रानडुकराने संपूर्ण भाजीपाला पीकच उद्ध्वस्त केले. दोन महिन्यांपासून कष्ट करून उभे केलेले पीक रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांनी काही तासात नष्ट केले. आता राहुलपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसरात्र पिकाच्या संगोपनाची तयारी आहे. तसे प्रयत्नही केले. मात्र रात्रीच्या काळोखात रानडुकरासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून भाजीपाला पिकाचे संरक्षण करणे म्हणजे स्वत:चा बळी देण्याचा प्रकार आहे. रानडुकराच्या हल्ल्यात अनेक शेतकºयांनी जीव गमावला, काहींना अपंगत्वही आले. आता त्या कुटुंबात शेती करणाराच उरला नाही, अशी स्थिती आहे.वनविभागाची मदत ठरते तुटपुंजीवनविभाग शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली अत्यल्प मोबदला देतो यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघत नाही. शिवाय वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याची तक्रार केल्यानंतरही त्याचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा त्यांच्या सोयीने शेतात पोहोचते. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण दिवसागणिक वाढत जात आहे. याकरिता वन विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी