शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या नावाने गाळ वीटभट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.

ठळक मुद्देमातीची साठवणूक : गोकी धरणातील गाळ चालला दारव्हा, यवतमाळकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या नावावर वीटभट्टी चालकांनी मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केले आहे. क्षमतेपेक्षा अधिक गाळाची ने-आण होत आहे. यातून शासनाच्या तिजोरीला फटका बसला आहे. तहसील प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दारव्हा तालुक्यातील गोकी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. हा गाळ शेतजमिनीसाठी सुपीक आहे. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना गाळ काढता आला. व्यापाऱ्यांनी या गाळावर आपली नजर वळविली आहे. विटभट्टीकरिता शेतकऱ्याच्या नावावर अर्धा गाळ वळता केला आहे. शहराबाहेर हा गाळ डम्प केला जात आहे.धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.तहसीलदार येणार असल्याची पूर्वसूचनागोकी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अवैध उत्खननाचा मुद्दा माध्यमातून चर्चेला आल्यानंतर दारव्हाचे प्रभारी तहसीलदार संजय जाधव यांनी अकस्मात या उत्खननावर धाड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार साहेब येणार याची पूर्वसूचना उत्खनन करणाºयांना मिळाल्याने ते सावध झाले होते. उत्खननासाठी वापरणारे जेसीबी व ट्रक परिसरातच उभे होते. मात्र ही वाहने सोडून चालक व मालक तेथून पसार झाले होते. तहसीलदारांना केवळ खोदलेला परिसर व उभी असलेली वाहने हेच पाहावयास मिळाले. आता यात तहसीलदारांकडून कोणावर काय कारवाई होते, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.परवानगी केवळ ४०० ब्रासचीचगोकी प्रकल्पातून ४०० ब्रास गाळ काढण्याला परवानगी कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या परवानगीच्या आधारे ३१ मेपर्यंत हा गाळ काढण्याच्या सूचना संबंधितांना प्रभारी तहसीलदारांनी दिल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. दोन वीटभट्टी चालकांना १६० रूपये ब्रासप्रमाणे गाळ नेण्यास मुभा आहे. या भागात ३० ते ४० टिप्पर आणि सहा जेसीबी गाळ काढण्याचे काम करीत आहे. याबाबत प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले आहे.मी मंडळ अधिकाऱ्याला पाहणीसाठी पाठविले होते. त्याने दोन जेसीबी आणि काही वाहन असल्याचे म्हटले. त्यातही एक जेसीबी बंद असल्याचे सांगितले. मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने दिसली. मात्र वाहनचालक पसार झाले होते.- संजय जाधव,प्रभारी तहसीलदार, दारव्हादरवर्षी ५०० ब्रासपर्यंत परवानगी जाते. यावर्षी कोरोनामुळे त्यात घट झाली. ४०० ब्रासला परवानगी दिली. नव्याने ९०० ब्रास उत्खननासाठी अर्ज आले आहेत. त्याची परवानगी बाकी आहे. पाटबंधारे विभाग परवानगी देते तोच व्यक्ती माती उचलत आहे किंवा नाही याची जबाबदारी तहसीलची आहे.- अशोक डगवार, शाखा अभियंता, गोकी प्रकल्प, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी