शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत ‘मार्जीन’चा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:25 PM

कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या कापसात ‘घट’च्या नावाखाली मोठी ‘मार्जीन’ ठेवली जात आहे. त्याआड कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ सुरू आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढालग्रेडर्स-जिनिंग-प्रेसिंग मालकांचे साटेलोटे

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या कापसात ‘घट’च्या नावाखाली मोठी ‘मार्जीन’ ठेवली जात आहे. त्याआड कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ सुरू आहे. सीसीआय-पणन महासंंघाचे ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लुबाडणूक आणि शासनाची फसवणूक सुरू आहे.देशभरात सीसीआयमार्फत कापसाची खरेदी सुरू आहे. महाराष्ट्रात या खरेदीसाठी सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ सीसीआयच्या दिमतीला आहे. कापसापासून निघणाऱ्या रूईमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ‘घट’च्या माध्यमातून गैरव्यवहार होत आहेत. शासनाने शंभर किलो कापसापासून ३३ किलो ५०० ग्रॅम रूईची परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात कापसापासून सुमारे ३५ किलो रूई निघतो आहे. प्रति क्विंटल दीड किलो रूईची ‘मार्जीन’ बहुतांश ठिकाणी ठेवली जात आहे. फरदड कापसातून तर प्रति क्विंटल ३६ किलोपर्यंत रूई निघत असल्याचे सांगितले जाते. रुईमधील प्रति क्विंटल दीड किलो ‘मार्जीन’च्या माध्यमातून हा घोटाळा करण्यासाठी ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांनी साखळी बनविली आहे. त्या माध्यमातून सर्वत्र कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला जात आहे. शेतकऱ्यांचा कापूस ओला, कमी गुणवत्तेचा दाखवून त्याला कमी भाव दिले जात आहे. दुसरीकडे याच चांगल्या दर्जाच्या कापसातून अधिक रूई काढून प्रत्यक्षात शासनाला कमी दाखविली जात आहे. या माध्यमातून शासनाचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे.

महाव्यवस्थापक कार्यालयाची डोळेझाकसीसीआयचे मुख्यालय दिल्लीत असून महाराष्ट्राचे मुंबईत आहे. औरंगाबाद व अकोला येथे सीसीआयचे महाव्यवस्थापक कार्यरत आहेत. या घोटाळ्याला या कार्यालयांमधूनही दुर्लक्ष करून हातभार लावला जात आहे. कापूस खरेदी दरम्यान जिनिंगला लागणाºया आगीही संशयास्पद असून त्यातच या खरेदीतील गौडबंगालाचे भक्कम पुरावे दडलेले आहेत.महाराष्ट्रात एक कोटी गाठींंचा अंदाजयंदाच्या हंगामात देशात तीन कोटी ७० लाख रुईगाठी तयार होऊ शकतील, एवढ्या कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. त्यातील ९२ लाख ते एक कोटी १० लाख गाठी एकट्या महाराष्ट्राच्या असतील. गुजरात एक कोटी, राजस्थान-पंजाब व हरियाणा मिळून ६५ लाख गाठी, मध्यप्रदेश १८ ते २० लाख गाठी, आंध्रप्रदेश-तेलंगाणा ५५ लाख गाठी तर कर्नाटक-ओडिसा आदी राज्यांमिळून २२ ते २३ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे.गैरप्रकारात तेलंगाणा आघाडीवररूईगाठींमधील ‘मार्जीन’च्या माध्यमातून सीसीआयमध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यात तेलंगाणा राज्य सर्वात आघाडीवर आहे. त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात ग्रेडर व जिनिंग यांच्या मिलिभगतमधून हा घोटाळा सुरू आहे. सीसीआयमधील या रूई ‘मार्जीन’ घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास यातील ‘वास्तव’ पुढे येईल.

टॅग्स :cottonकापूस