शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकांना बसणार महावितरणचा शॉक

By admin | Updated: November 23, 2014 23:26 IST

भारनियमन, खंडित वीज पुरवठा, जळणाऱ्या डीपी आणि कमी दाबाच्या वीज पुरवठा यंदाच्या रबी हंगामाला जबरदस्त शॉक देणार आहे. रबीची लगबग पुसद उपविभागात सुरू झाली असली तरी विजेची

पुसद : भारनियमन, खंडित वीज पुरवठा, जळणाऱ्या डीपी आणि कमी दाबाच्या वीज पुरवठा यंदाच्या रबी हंगामाला जबरदस्त शॉक देणार आहे. रबीची लगबग पुसद उपविभागात सुरू झाली असली तरी विजेची समस्या शेतकऱ्यांना संकटात आणणारी ठरू शकते.
खरीप हंगामाने दगा दिल्यानंतरही पुसद उपविभागातील शेतकरी रबीच्या तयारीला लागले आहे. गहू, हरभरा पिकांचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. मात्र त्यांच्या मनात वीज समस्येची कायम धास्ती आहे. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यात तब्बल आठ ते दहा तासाचे भारनियमन केले जाते. कृषी फिडरवर तर केवळ रात्रीच वीज पुरवठा होत आहे. त्याचा फटका रबी हंगामाला बसू शकत आहे. विजेची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. उपविभागात कुठेही पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नाही. त्यातच वीज चोरांचेही समस्या कायम आहे. उपविभागात अनेक वर्षांपासून असलेले वीज साहित्य आजही उपयोगात आहे. अनेक गावातील वीज खांब वाकलेले आहे. त्यावरून तारा लोंबकळत आहे. अर्थिंगचे तार जीर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी डीपी उघड्यावर आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होतच नाही. विजेची समस्या घेऊन उपविभागातील शेतकरी वीज वितरणचे उंबरठे झिजवितात. परंतु कोणताही अधिकारी या शेतकऱ्यांचे समाधान करीत नाही.
भारनियमनाव्यतिरिक्त खंडित होणारा वीज पुरवठा मोठी डोकेदुखी आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाला की दुरुस्तीसाठी कोणीही येत नाही. आठ-आठ दिवस कृषी फिडर बंद असते. यासोबतच कमी दाबाचा वीज पुरवठा मोटारपंप जाळण्यात हातभार लावत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावले आहे. परंतु मोटारपंप जळण्याची भीती असल्याने शेतकरी ओलित करण्यास मागेपुढे पाहतात. या सर्वांवर मात करीत रबीचे ओलित कसे करावे, असा प्रश्न आहे.
भारनियमनासोबतच मजुरांची समस्याही कायम आहे. रात्री बे रात्री ओलित करण्यासाठी मजूर येण्यास तयार नसतात. कृषी फिडरवरची वीज रात्रीच सुरळीत राहत असल्याने रात्रीच ओलित करावे लागते. अशा स्थितीत शेतकऱ्याला हातात फावडे घेऊन ओलित करण्याशिवाय पर्याय नसतो. (वार्ताहर)