शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

दारव्हा तालुक्यात ६६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तालुक्यात ६६ हजार ३०७ हेक्टर सर्वसाधारण, तर ६६ हजार १३५ हेक्टर पेरणीयोग्य शेती क्षेत्र आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारी : शेतकऱ्यांसमोर पीककर्जाची अडचण

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात यावर्षी खरिपात ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्यासाठी क्षी विभागाने नियोजन तयार केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, शेती साहित्य खरेदीसाठी सहकार्य, तसेच मार्गदर्शन केले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तालुक्यात ६६ हजार ३०७ हेक्टर सर्वसाधारण, तर ६६ हजार १३५ हेक्टर पेरणीयोग्य शेती क्षेत्र आहे. त्यात कापूस ३१ हजार २५० हेक्टर, ऊस १० हेक्टर, सोयाबीन २५ हजार ३०० हेक्टर, तूर आठ हजार ५०० हेक्टर, मूग ३०५ हेक्टर, उडीद ४०० हेक्टर, ज्वारी ७० हेक्टर, बाजरी आणि मका १० हेक्टर आणि भाजीपाला, फळबाग १३० हेक्टर, याप्रमाणे ६६ हजार १३५ हेक्टरवर पेºयाचा अंदाज आहे.६६ हजार हेक्टरचे क्षेत्र गृहित धरून तालुका कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभागाने बियाणे, रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत तयारी सुरू केली. यावर्षी कोरोनामुळे कृषी केंद्राची शेतकऱ्यांकडील उधारी बाकी राहिली. परिणामी बियाणे, रासायनिक खतांचे बुकींग कमी झाले. त्यामुळे वेळेत आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आला. जून महिन्याच्या सुरवातीला बियाणे, खतांच्या खरेदीला मोठी गर्दी उसळते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गोंधळ उडू नये, यासाठी अधिकारी कामी लागले आहे. मात्र शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्री, पीक कर्ज यासह अनेक प्रश्न आ वासून उभे आहे.अद्याप शेतकऱ्यांच्या घरात कापूस, तूर, चना पडून आहे. खासगी बाजारात भाव नाही. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर संथगतीने खरेदी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता नोंदणी केली. मात्र कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तूरीकरिता १00 जणांचा क्रमांक लावला जातो. तसेच कर्जमाफीची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. नियमित कर्जदारांना पीक कर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे मिळण्यास अडचणी आहे. यामुळे बियाणे, खतांच्या खरेदीसाठी वळेवर पैसे न मिळाल्यास पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी बांधव आहे.रोहिणी नक्षत्र जेमतेम आठवडाभरावर येवून ठेपले आहे. मात्र अनेक शेतकºयांकडे बियाण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहे.बियाणे, खते बांधावरकृषी केंद्रात गर्दी होऊ नये म्हणून कृषी विभागाने शेतकरी गटामार्फत बियाणे, खते थेट बांधावर पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. तसेच एका लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. येथील दोन एजंसीच्या सहकार्याने साहित्याची उचल करून बांधावर पोहोचविले. याप्रसंगी बीडीओ राजीव शिंदे, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, नालंदा भरणे, पी.पी. कांबळे, जीवन जाधव, विजयकांत जैवळ, संदीप चव्हाण, प्रेमसिंग राठोड, सुरेश धार्मिक, गणेश अग्रवाल उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज