शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना दहशतीमुळे चार खांदेकरीही मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत.

ठळक मुद्देनातेवाईक फिरकेनात : अंत्यसंस्कारासाठी नऊ हजारांचे ‘पॅकेज’

सुरेंद्र राऊत यवतमाळ : सर्वच धर्मात अंत्यसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देह त्याग केल्यानंतर आत्म्याचा इहलाेकीचा प्रवास सुरू हाेताे. देहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ताे पंचत्वात विलीन हाेतो. अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत. काेराेना आजाराबाबत अनेक संभ्रम आहेत. अनेकदा तपासण्या करून पाॅझिटिव्ह आलेली व्यक्ती मृत्यूच्या पूर्वी निगेटिव्ह येते. अशा मृतांची संख्याही माेठी आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील सदस्यच येत नाहीत. त्यामुळे मुलांनाच आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी एकट्याने उचलावी लागते. अनेकांना तर मृत्यू झाल्यानंतर घरापर्यंतही आणले जात नाही. इतकी भीती आहे. पूर्वी शेजारी, मित्रमंडळी ज्या घरी मृत्यू झाला तेथे आवर्जून जात. काय हवं नकाे ते पाहत हाेते. इतकंच काय ज्या घरात मयत झाली तेथील चूल पेटविली जात नव्हती. त्यामुळे शेजारीपाजारीच किंवा नातेवाइकांकडूनच जेवण, चहा, नाश्ता याची व्यवस्था केली जाई. काेराेना महामारीच्या दहशतीमुळे आता हा संस्कारच मागे पडला आहे. कधीकाळी महानगरात घडलेले प्रकार आता यवतमाळसारख्या लहानशा शहरात पाहावयास मिळत आहेत.  कोरोना महामारी आणखी कुठल्या पातळीवर नेते याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे.  

गरिबांना अत्यंंविधीच्या पॅकेजचा खर्च न परवडणारा 

काेराेना संशयिताचा मृतदेह थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत नेला जाताे. त्यासाठी ठराविक रकमेचे पॅकेज माेजले जाते. अंत्यविधीला मदत करणाऱ्यांना साडेचार हजार रुपये द्यावे लागतात. यात ते रुग्णवाहिकेसह सर्व सुविधा पाेहाेचवितात. नंतर स्मशानात सरणाच्या लाकडाकरिता साडेतीन हजार रुपये घेतले जातात. हा नऊ हजार रुपये अंत्यविधीचा खर्च गरिबांना न परवडणारा आहे; मात्र अडचण असल्याने त्यांचाही नाइलाज झाला आहे. काळाच्या ओघात अंत्यविधी हा पार पाडणे कठीण झाले आहे. पॅकेजमध्ये केवळ मृतदेहाला अग्नी दिला जाताे. दुसऱ्या दिवशी राख नातेवाइकांना सुपूर्द केली जाते. यावरून काेराेनामुळे मानवी जनजीवन किती ढवळून निघालंय याची प्रचिती       येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू