शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या कामांवर यंत्रणेचीच टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:27 IST

जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

ठळक मुद्देकामे रखडली : कोट्यवधींचा खर्च मातीमोल

ऑनलाईन लोकमतमहागाव : जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही. तर दुसरीकडे या कामामुळे जलस्तर कुठेही वाढलेला दिसत नाही. त्यावरील कोट्यवधींचा खर्च मात्र मातीमोल झाला आहे.महागाव तालुक्यात झालेली ४२१ कामांपैकी अपवाद वगळता किती उपयुक्त ठरली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तीन-चार कामे एकत्र करुन ई-टेंडरला लावलेली कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. या कामांबाबत वरिष्ठ गंभीर नसल्याने कोट्यवधींची कामे ठप्प आहे. गावोगाव कामांची मागणी असूनही यंत्रणेकडून कृती आराखड्यात घेण्यात आले नाही. यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे एरिया कमांडमध्ये सिंचन उपविभागातर्फे ६६ लाखांची कामे अंबोडा येथे करण्यात आली. हा भाग सिंचनाच्या कमांड एरियात येत असल्याने अन्य विभागाने येथे काम घेतले नाही, हे विशेष.गावकऱ्यांची मागणी असूनही तेथे काम सूचविण्यात आले नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा ठपका ठेवत वन विभागाच्या तीन अधिकाºयांना महागाव तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने नोटीसला उत्तर पाठविले असून रोहयो आणि प्रादेशिक विभागाने अद्याप दखल घेतली नाही. तसाच अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. बाबासाहेब नगर, बोरी, दगडथर, धारेगाव, काळीटेंभी, कासारबेहळ, कासोळा, कातरवाडी, पेढी इजारा, पिंपरी इजारा, शीरमाळ, वाकद येथे जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. परंतु पाण्याचा स्तर उंचावला नाही. नेमकी याच परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यातील या गावांचा पाणी ताळेबंद बघितला असता त्यांना आठ हजार ७१४ सघमी पाण्याची आवश्यकता आहे. जलयुक्तच्या कामामुळे एक हजार ४५५ सघमी पाण्याचा अपधाव अडविण्यात आला आहे, असे असूनही पाणीटंचाई का, हा संशोधनाचा विषय आहे.चौकशी करणे गरजेचेसिंचन विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, पंचायत समिती व अन्य यंत्रणेकडून करण्यात आलेली जलयुक्तची कामे तपासण्याची गरज आहे. यंत्रणेकडून ई टेंडर झालेली कामे सुरुच करण्यात आली नाही. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविता आले नाही. पर्यायाने तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविताना अपयश आले आणि दुसरीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.