शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

धुवाधार पावसाने शेतजमिनी खरडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM

यवतमाळ शहरात सायंकाळी ५ वाजता एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. घाटंजीमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजता थांबला. बाभूळगाव, आर्णी, महागाव, पांढरकवडा, दारव्हा, राळेगाव, दिग्रस, कळंब तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. पुसद तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत ढग कायम असले तरी पाऊस मात्र बरसला नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात १३ मिमी पावसाची नोंद : हातगाव, बोरीअरब शिवारात पाणी शिरले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस बरसला. यामुळे अनेक ठिकाणी दिलासा मिळाला. तर काही ठिकाणी नुकसानही झाले. सर्वाधिक फटका हातगाव आणि बोरीअरब शिवाराला बसला. जिल्ह्यात १३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.अनेक दिवसानंतर बरसलेल्या पावसाने काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार हजेरी लावली. हा पाऊस काही भागासाठी सुखकारक ठरला. तर काही भागासाठी नुकसानदायक राहिला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.घाटंजीत दुपारपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली होती. बाभूळगावला सायंकाळी पाऊस बरसला. यवतमाळातही पावसाने दमदार हजेरी लावली. बोरीअरब आणि दारव्हा भागातही पाऊस बरसला. महागावातही जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गत २४ तासात १३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.गेल्या २४ तासात यवतमाळात ४७ मिमी पाऊस बरसला, बाभूळगाव २५.५ मिमी, कळंब १५ मिमी, दारव्हा ४३ मिमी, दिग्रस २१ मिमी, आर्णी ७.९ मिमी, नेर ३३ मिमी, उमरखेड सहा मिमी, महागाव सहा मिमी, वणी पाच मिमी, मारेगाव सहा मिमी, झरी तीन मिमी, केळापूर सात मिमी, घाटंजी दोन मिमी, तर राळेगावात २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.नेर, घाटंजी, आर्णी, पांढरकवडात जोरदार हजेरीयवतमाळ शहरात सायंकाळी ५ वाजता एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. घाटंजीमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजता थांबला. बाभूळगाव, आर्णी, महागाव, पांढरकवडा, दारव्हा, राळेगाव, दिग्रस, कळंब तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. पुसद तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत ढग कायम असले तरी पाऊस मात्र बरसला नाही. राळेगाव तालुक्यातही सायंकाळी ढग दाटून आले तरी पावसाला सुरवात झालेली नव्हती. मात्र संपूर्ण जिल्हाभरात रविवारी दिवसभर ढगाळी वातावरण कायम होते. पहिलाच मोठा पाऊस रविवारी बरसल्याने यवतमाळ शहरात गारवा पसरला.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस