शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष

By admin | Updated: December 11, 2014 23:15 IST

जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात सिंचनाची योग्य सोय नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडले आहे.

वणी : जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात सिंचनाची योग्य सोय नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडले आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न गहन झाला आहे. तथापि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तथा शासनाच्या उदासीन धोरणामुळे आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकरी यावर्षी पुन्हा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येणार म्हणून सांगणारे राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना कितपत प्रतिसाद देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने तर पुसणार नाही ना, अशी शंकता शेतकऱ्यांना सतावत आहे.
वणी तालुक्यात खरीपात २६ हजार शेतकऱ्यांनी ४५ हजार हेक्टर शेतजमीनीवर कापसाची लागवड केली. चार हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली. शेतात पेरणी करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर हा महिना कोरडा पडल्यामुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. त्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्याने व पाहिजे त्या पधदतीने पाणी जमिनीत न गेल्याने पिकाची वाढ खुंटली. दरम्यान पिकांचे वेळापत्रक चुकल्याने वातावरणाचा फरक पिकांवर दिसून आला.
या सर्व बाबींचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. कापूस, सोयाबीन उत्पादनात लक्षणीय घट आली आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे. शेतमालाला चांगले भाव मिळतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल साठवून ठेवला. परंतु दिवाळी या मोठ्या सणासाठी गरीब शेतकऱ्यांनी आपला कापूस सावकारास व व्यापाऱ्यास विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी सण साजरा केला. मात्र शेतीसाठी लागणारे पैसे निघणे अवघड झाले आहे. परिणामी पुढील वर्षाचा प्रपंचाचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या घरी जे उत्पन्न आले, त्यात कापूस व सोयाबिनला हमी भावसुध्दा मिळत नाही. हमी भावापेक्षाही कमी किमतीने त्यांचा शेतमाल खरेदी केला जात आहे. नाईलाजास्तव शेतकरी तो विकत आहेत. तूर्तास कापसाला प्रति क्विंटल केवळ तीन हजार ५०० ते तीन हजार ८०० रूपयांपर्यंतच भाव मिळत आहे. शासन मात्र चार हजार ५० रूपये प्रति क्विंटल हमी भाव असल्याचा घोषा लावत आहे. सोयाबिनची तीच स्थिती आहे. त्यामुळे शासनाने या पिकांचे भाव वाढवून देण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांनी मतदारांसह शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र निवडणूक आटोपताच या सर्वांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकरी ेदेशोधडीला लागत असताना त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणीच तयार दिसत नाही. (प्रतिनिधी)