शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी वळविले शेतीसाठी

By admin | Updated: May 11, 2017 01:10 IST

तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे.

पाणीटंचाईचे संकेत : पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच पुसद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुसद शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार असतानाच पूस धरणातून उन्हाळी भूईमूगासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे पुसदवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला. परिणामी पूस धरण पूर्णपणे भरले होते. परंतु या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने धरण १०० टक्के भरले असतानाही पाणीसाठा हा केवळ ७० टक्केच असतो. ३० टक्केहून अधिक जागा गाळाने व्यापलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र या प्रकल्पावर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या पाण्याचा उपसा करण्यात येतो. या प्रकल्पातून उन्हाळी भूईमूगासाठी पाणी सोडल्या जात असताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी या पाण्याचा वापर कशासाठी होतो, पाणी वाहून तर जात नाही ना, याची साधी चौकशीही करीत नाही. केवळ कागदी घोडे नाचविली जात आहे. सध्या पुसद शहराला नियमित एक तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात तो जास्तही केला जातो. कोणतेही नियोजन नसतानाही नगरपरिषद प्रशासन मूग गिळून बसले आहे. ज्या भागात केवळ एक तास पाणी मिळतो तो भाग कमी दाबाचा असल्याने अनेकांचे पाणीच होत नाही. त्यामुळे अनेकांना आताच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शहराला योग्य व नियमित पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच वाया जाणारे व शेतीला वापर होणारे पाणी थांबविणे आवश्यक आहे. पूस धरणात २० एप्रिल रोजी २६ टक्के जलसाठा होता. ५ मे रोजी २० टक्के तर १० मे रोजी केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या शहराचे तापमान ४३ अंशांच्या वर गेले असून पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यातच प्रशासन भूईमुगाला पाणी सोडत असल्याने हजारो लिटर पाणी वापरण्याऐवजी नाल्यात वाहून जात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. आजही कॅनॉलमध्ये पाणी सोडल्या जात आहे. पाण्याची नासाडी थांबवून योग्य नियोजन न केल्यास पुसदकरांना पाणीटंचाईची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. पुसद नगर परिषदेचे नियोजनच नाही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणातील पाणीसाठा सध्या अत्यल्प आहे. अशातच याच धरणातील पाणी शेतीसाठी अनेकजण वापरत आहे. परंतु अशावेळी नगर परिषद मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेकडून आगामी पाणीटंचाई लक्षात घेता कोणतेही नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.