शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ढाबे, हॉटेलात गुन्हेगारांना आश्रय

By admin | Updated: May 14, 2016 02:30 IST

वर्धा जिल्ह्यातील वडनेरपासून तर पिंपळखुटीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७वर अनेक ढाबे व हॉटेल्स आहे.

राष्ट्रीय महामार्ग : ट्रक लुटीच्या दोन घटना घडूनही सर्वच विभाग उदासीनप्रवीण पिन्नमवार पांढरकवडावर्धा जिल्ह्यातील वडनेरपासून तर पिंपळखुटीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७वर अनेक ढाबे व हॉटेल्स आहे. त्यापैकी काही अधिकृत, तर काही अनधिकृतपणे थाटण्यात आली आहे. हे ढाबे व हॉटेल बंद करण्याची वेळ पाळली जात नसून रात्री-अपरात्री सुरू राहतात. त्यामुळे गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा घडल्यानंतर काही गुन्हेगार तेथे आश्रय घेत असल्याची माहिती आहे.राष्ट्रीय महामार्गावरील काही ढाबे व हॉटेलमध्ये परवानगीशिवाय दारू विक्री केली जात आहे. कोणत्याही हॉटेल व ढाब्यावर सुरू करण्याची व बंद करण्याच्या वेळेबाबत तसेच व इतर कारवाई होत नाही. त्यामुळे ते मुजोर झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर तसेच तालुक्यातील सर्वच मार्गावर ढाब्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. दिवसभर रिकामे दिसणारे ढाबे, हॉटेल्स रात्री फुल्ल दिसतात. रात्री ९ वाजतानंतरची गर्दी अनेक प्रश्नांना जन्म देणारी ठरत आहे. पांढरकवडा शहर आणि तालुक्यातील काही लोकांची अशा ढाब्यांवर नेहमीच उठ-बस सुरू असते. रात्री तेथे त्यांचा ठिय्या असतो. या ढाब्यांवर अवैधरित्या दारूची विक्री करण्यासोबतच काही ठिकाणी जुगारही खेळला जातो. त्यातून काही लोकांमध्ये अनेकदा वादही उद्भवतात. ढाब्यांवर बसण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन पाळले जात नाही. जोपर्यंत ग्राहक उठत नाही, तोपर्यंत ढाबा चालकही ढाब्याच्या झडपा पाडत नाही. शहरालगत तसेच वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात रात्री १२ ते २ वाजतापर्यंत ढाबे व हॉटेल्स सुरू असतात. वास्तविक आधीच ही दुकानदारी बंद होणे गरजेचे आहे. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने ढाबा व हॉटेल्स चालकाचे चांगलेच फावत आहे. जिल्हा ठिकाणची पथकेही कधी याप्रकरणी कारवाई करताना दिसत नाही. नुकतेच देवधरी घाटात ट्रक लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीने ट्रक चालकाचा निर्घृण खून केला होता. सदर ट्रक येण्यापूर्वी तो ट्रक येत आहे किंवा नाही, याची पाहणी करण्याकरिता सदर टोळक्याने रात्री दरम्यान एका हॉटेलचाच आधार घेतला होता, असे पोलीस तपासात पुढे येत आहे. तसेच नुकताच करंजीजवळील ट्रक दरोडा प्रकरणात लुटारूंनी नागपूरच्या दिशेने पळ काढला होता. ट्रकला थांबविण्यासाठी ट्रकच्या काचेवर दारूची बॉटल फेकून काच फोडला होता. या प्रकरणातही लुटारूंनी गुन्हा घडण्यापूर्वी हॉटेल्स किंवा ढाब्यावर आपल्या ठिय्या बसविला होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. एकूणच सतत घडणाऱ्या गुन्ह्यात ढाबे व हॉटेल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. वेळी-अवेळी ते सुरू राहात असल्याने गुन्हेगारांना तेथे आश्रय घेणे सोयीचे ठरते. पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.