शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

कापूस पोहोचला ६२०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:11 PM

मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सध्या कापूस सहा हजार २०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाडीचा दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे.

ठळक मुद्देगुढीपाडव्याची प्रतीक्षा : महिनाभरात दर ८०० रूपयांनी वधारले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सध्या कापूस सहा हजार २०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाडीचा दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे.शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर वाढण्यास सुरूवात झाली. कापसाचे दर तूर्तास सहा हजार रूपये क्विंटलच्यावर पोहोचले आहेत. या दरात आणखी किती वाढ होते याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सामान्य शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापसाची विक्री केली. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे थोड्या प्रमाणात कापूस साठवून आहे. बहुताश कापूस व्यापाऱ्याजवळच साठवून आहे. त्यांनाच या वाढीव दराचा लाभ होत आहे.गत दोन वर्षांपासून कापसाला सहा हजार रूपये दर मिळतील म्हणून शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला होता. मात्र दर वाढण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकरिता काढला. शेतकऱ्यांकडील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर सहा हजार २२४ रूपये प्रति क्विंटलपर्यंत चढले आहे. राळेगाव येथे कापसाला हा दर मिळाला. यवतमाळात सहा हजार १०० रूपयांचा दर होता. राज्यातील काही बाजारापेठेत अशीच स्थिती आहे. सरकीचे दर वधारल्याने कापसाच्या दरात वाढ झाली. तसेच रूपयाचे अवमूल्यन कायम असल्याने कापसाच्या दरात तेजी आल्याचे सांगितले जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पांढरे सोने आधीच विकले आहे. आता वाढलेल्या दराचा फायदा अवघ्या काही शेतकऱ्यांनाच होणार आहे.गुढीपाडव्यानंतर विक्रीस येणार कापूसकाही मोजक्याच शेतकऱ्यांकडे आता कापूस साठवून आहे. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. गुढीपाडव्यापर्यंत असे शेतकरी कापूस दरवाढीची प्रतीक्षा करतील . त्यानंतरत्ते कापूस विक्रीस काढतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. यामुळे गुढीपाडव्यापर्यंत कापूस दर काय राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी