शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

एकरी खर्च १२ हजार, उत्पन्न ११ हजार

By admin | Updated: October 14, 2015 02:59 IST

मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची छाया उमरखेड तालुक्यावरही सुरुवातीपासूनच होती. अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला ...

सोयाबीन बुडाले : मुळावा परिसरात सोयाबीनचा उतारा सरासरी केवळ तीन क्ंिवटल
दिनेश चौतमाल मुळावा
मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची छाया उमरखेड तालुक्यावरही सुरुवातीपासूनच होती. अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला असून आता सोयाबीन काढणीच्या वेळी तर शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. सोयाबीनच्या एका एकराला १२ हजार रुपये खर्च आला तर सरासरी उतारा तीन क्ंिवटल येत असल्याने ११ हजार रुपयेही हातात येत नाही. एक ते दीड हजार रुपयांचा एकरी घाटा सोयाबीनमुळे सहन करावा लागत आहे. या परिस्थितीने शेतकरी पुरते हवालदिल झाले आहे.
मराठवाड्यालगतच्या उमरखेड, पुसद आणि महागाव या तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण होते. त्यामुळे पिकांची योग्य वाढ झाली नाही. महिना महिना पावसाने दडी मारल्याने पोषक वातावरणच निर्माण झाले नाही. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पिकांना जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता हाती सोयाबीन आल्यावर त्यांचा भ्रमनिरास होत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे लागवड करण्यात आली होती. परंतु पेरणीनंतर शेंगा भरणीच्या काळात पाऊसच झाला नाही. त्यामुळे सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे बारीक झाले. त्यानंतर पाऊस झाला परंतु या पावसाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले. वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब आले. यात सुमारे २५ टक्के नुकसान झाले.
आता सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला आहे. सोंगणीचे दर आकाशा भिडले आहे. गतवर्षी १३०० रुपये सोंगणीचे दर आता १७०० रुपयावर गेले आहे. हार्वेस्टर काढणीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन ठेकेदारी पद्धतीने मळणी यंत्रणातून काढली जात आहे. मळणी यंत्राला प्रति क्ंिवटल ४०० ते ५०० रुपये द्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या हाती केवळ दोन ते तीन क्ंिवटल सोयाबीन येत आहे. यामुळे उत्पन्नातून खर्च वजा जाता एक ते दीड हजार रुपयेही उरत नसल्याचे दिसून येते.
सोयाबीनच्या कमी उताऱ्याचा शोध घेण्यास कृषी विभागाला अपयश आले. खोड किड, मोझॅक की अपुरा पाऊस हे कुणीही नेमके सांगत नाही. गेल्या २० ते २५ वर्षांपासून सोयाबीन सलगपणे घेतले जाते. त्याचा तर हा परिणाम नसावा ना अशी शंकाही शेतकरी घेऊ लागले आहे. सोयाबीनला भरपूर शेंगा लागल्या. परंतु त्यात दाणे भरले नाही. आता बँकांचे आणि सावकाराचे कर्ज कसे फेडावे, अशी विवंचना शेतकऱ्यांंना लागली असून सोयाबीनने अक्षरश: बुडविल्याचे शेतकरी सांगत आहे.