शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभेला सभापतींची दांडी

By admin | Updated: May 15, 2014 23:57 IST

आचारसंहिता शिथील झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. मात्र या सभेला उपाध्यक्षासह चार सभापती गैरहजर होते.

यवतमाळ : आचारसंहिता शिथील झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. मात्र या सभेला उपाध्यक्षासह चार सभापती गैरहजर होते. यावरुन रखडलेली कामे पूर्ण करण्याबाबत पदाधिकारी किती गंभीर आहे, हे दिसून येते. याच सभेत तिवसा येथील डायरियाच्या थैमानाचा मुद्दा गाजला.

जिल्हा परिषदेतील कामे रेंगाळली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संपूर्ण कामकाजच ठप्प होते. अनेक कामांची वर्कऑर्डर होऊनही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. प्रत्यक्षात पदाधिकार्‍यांनाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. गुरूवारी झालेल्या स्थायी समिती सभेला उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, शिक्षण व आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण, महिला बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर आदी गैरहजर होते. अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी समजाकल्याण सभापती आणि विरोधकांच्या मदतीने सभेत कामकाजाचा आढावा घेतला.

बैैठकीच्या सुरूवातीलाच तिवसा येथील डायरीयाच्या साथीचा मुद्दा चर्चेस आला. गावातील पाणी स्रोतात ब्लिचींग पावडर नसल्याची बाब चौकशीत समोर आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुंदन राठोड यांनी सांगितले. याप्रकरणी दोषी ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिले. त्यानंतर मागील सभेत उपाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रसुतीगृहाचा मुद्यावर दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. चार पंचायत समितीतील शाळा इमारतीच्या निर्लेखनाला मंजुरी देण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी इजारा येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे अभियंत्याने सांगितले. बांधकाम विभागाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील १0 कामे मंजूर झाली आहे. तसेच तिसर्‍या टप्प्यातील सात कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.

धडक सिंचन विहीर योजनेतील एक हजार १५0 विहिरी रद्द करण्यात आल्या. १४ हजार ८४५ विहिरी होत्या. त्यापैकी सात हजार १५२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. नरेगामध्ये तीन हजार २00 विहिरी रुपांतरित करण्यात आल्या आहे. तर जिल्हा परिषदेच्या चार यंत्रणेकडून एक हजार ३00 विहिरी धडक सिंचन योजनेतून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गव्हर्नमेंट हायस्कूलसाठी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. अद्यापही त्याचे काम सुरू करण्यात आले नसल्याचे गटनेते देवानंद पवार यांनी सभेत सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी हे काम तातडीने सुरू करण्याचे ताकीद दिली. तसेच पवार यांनी माध्यमिक शाळेवर रिक्त असलेल्या १३५ जागांचा मुद्दा उपस्थित केला. पदोन्नतीमुळे रोस्टर निश्‍चित नसल्याने रखडल्याचे शिक्षणाधिकार्‍याकडून सांगण्यात आले. ऑगस्टपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल नरवाडे यांनी महागाव पंचायत समितीला शाखा अभियंता नसल्याचे सांगितले. तसेच अंबोडा-चिखलगाव रस्त्याच्या कामाची पुनर्निविदा करण्याची मागणी केली. (कार्यालय प्रतिनिधी)