शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे गलिच्छ राजकारण गावागावात वेशीवर टांगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

भाजपाची भाषा आणि व्यवहार अत्यंत दुटप्पीपणाचा आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपा के साथ अशी टॅग लाइन घेऊन महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रयत्न करणारी भाजपा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसते. एवढे कशाला तिथले भाजपाचे मुख्यमंत्रीही क्षुल्लक बाब असल्याचे सांगतात आणि याविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिक मराठी माणसावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. स्वाभिमान व्यक्त करणे देशद्रोह कसा, असा प्रश्नही सावंत यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्राने आजवर पाहिले नाही, अशा प्रकारचे अत्यंत गलिच्छ राजकारण भाजपकडून केले जात आहे. या राजकारणासाठी देशाच्या संस्था वापरल्या जात आहेत. स्वार्थ संपला की शिडीला लाथ मारायची सवय असलेल्या भाजपाला धडा शिकवू, असे सांगत शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपाचे गलिच्छ राजकारण वेशीवर टांगणार असल्याचे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपाची भाषा आणि व्यवहार अत्यंत दुटप्पीपणाचा आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपा के साथ अशी टॅग लाइन घेऊन महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रयत्न करणारी भाजपा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसते. एवढे कशाला तिथले भाजपाचे मुख्यमंत्रीही क्षुल्लक बाब असल्याचे सांगतात आणि याविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिक मराठी माणसावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. स्वाभिमान व्यक्त करणे देशद्रोह कसा, असा प्रश्नही सावंत यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मागील सात वर्षांपासून आम्ही भांडत आहोत. याच मागणीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला भेटून आले. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी घोषणा व्हावी म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही प्रयत्न केले. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. तरीही महाराष्ट्रातील भाजपा नेते गप्प आहेत. दुसरीकडे मराठी माणूस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याची मोहीम राबविली जात आहे. अशा स्थितीत सत्य नेमके काय आहे, हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही शिवसंपर्क मोहीम सुरू केल्याचे सावंत यांनी सांगितले. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाखो लोकांचे प्राण वाचविले. आजवर झालेल्या प्रत्येक सर्व्हेत कार्यशील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. जागतिक आरोग्य संस्थेनेही मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे कौतुक केलेले असताना महाराष्ट्राला कमीपणा दाखविण्याचे काम भाजपाकडून होत आहे. भाजपाचे किरीट सोमय्या यांची यादी पहा, त्यांनी आरोप केलेल्यापैकी अनेक जण आता भाजपात गेले आहेत. तिकडे गेल्यानंतर चौकशी थांबते. ही कसली भ्रष्टाचारविरोधी मोहीम, असा प्रश्न करीत भाजपा महाराष्ट्राच्या हिताविरोधात कार्यरत आहे. त्यांना येथील माणसांशी, मराठी मातीशी काहीही देणे-घेणे नाही. केवळ राजकारण आणि सत्तेसाठी त्यांची उठाठेव सुरू असल्याचा आरोपही सांवत यांनी पत्रकार परिषदेत केला.पत्रकार परिषदेला आमदार संजय राठोड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कालिंदाताई पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

केंद्राकडे महाराष्ट्राचे ३० हजार कोटी येणेकोरोनाच्या संकटाचा आपण मोठ्या धीराने सामना केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही या उपाययोजनांकडे विशेष लक्ष होते. मात्र, केंद्रातील भाजपने महाराष्ट्राची नेहमी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जीएसटी कायद्यानुसार महाराष्ट्राचा हिस्सा म्हणून केंद्राने ३० हजार कोटी रुपये द्यायला हवेत. मात्र, अद्याप ही रक्कम दिलेली नसल्याचे सांगत, हे एकप्रकारे जीएसटी कायद्याचे उल्लंघन असल्याचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. मात्र, अशाही स्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाच्या गोष्टींना निधी कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. 

पाठीत खंजिर खुपसणारा भाजपसारखा मित्र नकोच- शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. समान किमान कार्यक्रम आखून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहोत. पाठीत सुरा खुपसणाऱ्या भाजपपेक्षा शत्रू बरा, ही आमची भूमिका आहे. सेनेची पाळेमुळे घट्ट असल्यामुळे आगामी काळात सर्व पातळ्यांवर भाजपला पराभूत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना