शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता दिली

By admin | Updated: April 9, 2015 00:02 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात कोणतीही शस्त्र न घेता देशात वैचारिक क्रांती घडवून आणली.

प्रदीप आगलावे : धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे थाटात उद्घाटन, विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकापुसद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात कोणतीही शस्त्र न घेता देशात वैचारिक क्रांती घडवून आणली. त्यामुळे ते विसाव्या शतकातील महान क्रांतिकारक होते. बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्य दिली. भारतातील राष्ट्रवाद हा मानवतावादावर उभा केला, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रा.डॉ.प्रदीप आगलावे यांनी केले.स्थानिक महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात मंगळवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्व-२०१५ चे उद्घाटन झाले. यावेळी ‘आंबेडकरी विचारातून राष्ट्रीयता आणि सद्यस्थिती’ या विषयावर बीज भाषण देताना डॉ.आगलावे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे होत्या. धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शीतलकुमार वानखेडे, फकिरराव वाढवे, विश्वनाथ कांबळे, कालू पहेलवान डंगोरिया, अर्जुनराव लोखंडे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त करताना बाबासाहेबांचे संविधान समजून घेतल्याशिवाय समाजात जागृती होणार नाही, असे म्हटले. या कार्यक्रमाला भीमराव कांबळे, बंडू राऊत, संभाजी ब्रिगेडचे सुधीर देशमुख, प्रा.दादाराव अगमे, यादव जांभुळकर, प्रा.महेश हंबर्डे, अरविंद चव्हाण, अनिल चेंडकाळे, प्रा.दिनकर गुल्हाने, संतोष गायकवाड आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)अभ्यासिकेचे लोकार्पणयेथील लोकहित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने समाजातील गरीब, गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञासूर्य स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासिकेचा मोफत लाभ मिळणार आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष शीतलकुमार वानखडे, प्रा.विलास भवरे, दीपक मेश्राम, गणेश वाठोरे, दादाराव अगमे, भगवान हनवते, काशीनाथ मुनेश्वर, प्रभाकर गवारगुरू, प्रा.संजय खुपसे, संतोष गायकवाड, प्रा.महेश हंबर्डे, प्रा.डॉ.साखरकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.