शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित

By admin | Updated: October 16, 2016 00:55 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.

परतीचा पाऊस : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.सप्टेंबर अखेर आणि आॅक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला प्रचंड फटका बसला. शेंगांमधील सोयाबिनला जागीच कोंब फुटले. काही शेंगा गळून पडल्या. शेतकऱ्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. यामुळे ऐन सणांच्या दिवसांत बळीराजाच्या चेहऱ्यावरील हसू हिरावले. तब्बल ४२ हजार हेक्टवरील सोयाबीन पावसाने बाधीत झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यांना मोठा फटका बसला. यातून सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीने सरसकट मदत द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने पारित केला आहे. तथापि अद्याप शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतेही धोरण जाहीर झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. तथापी अद्याप शासनाने किंवा विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. (शहर प्रतिनिधी)सोयाबीन बाजारात येताच दरही गडगडलेसोयाबीन बाजार येताच व्यापाऱ्यांनी दरही पाडले आहे. गेल्या वर्षी जवळपास तीन हजार ५०० ते चार हजार रुपये प्रति क्ंिवटल दर मिळाला होता. यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच किमान १८०० ते २४०० रुपये प्रमाणे प्रति क्ंिवटल दर मिळत आहे. शासनाने सोयाबीनचा हमी दर प्रति क्ंिवटल दोन हजार ७७५ रुपये ठरविला आहे. मात्र हमी दरापेक्षाही कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. दसरा आणि दिवाळी सणात सोयाबीन विकूनच शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येते. मात्र यावर्षी दर गडगडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दिवाळी जेमतेम १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अद्याप शेतात कापूसही फुटलेला नाही. सोयाबीनला भावही मिळत नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.