Next

या पक्षाला सोबत घेऊन भाजप लढणार निवडणूक Amit Shah | Captain Amarinder Singh

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:00 PM2021-12-08T14:00:56+5:302021-12-08T14:01:20+5:30

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद झाला. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेना हा जुना मित्र भाजपपासून दूर झाला. असंच चित्र त्याआधी देशभरात पहायला मिळालं. एक काळ होता की देशात भाजपचे सर्वाधिक मित्रपक्ष होते. शिवसेना, तेलुगू देसम, अकाली दल, बिजू जनता दल, पीडीपी यांसारखे त्या त्या राज्यात सत्तेत असणारे आणि सत्ता स्थापनेत महत्वाची भुमिका बजावणारे भाजपचे मित्रपक्ष होते. पण आता सर्वजण भाजपपासून दूर झालेत. जनता दल आणि एआयडीएमके हे दोनच मोठे पक्ष भाजपचे मित्र आहेत.. पण आता भाजपला आणखी एक नवा मित्र मिळाला आहे.. आणि या मित्राच्या मदतीने भाजपने सत्ता मिळवण्याची तयारी सुरु केलीय.