अहमदनगर, लोकपाल, लोकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी आमरण उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाची केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली.