शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:17 PM

Lok Sabha Election 2024 Rajnath Singh And Congress : राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे डायनासोर पृथ्वीवरून नाहीसे झाले, त्याचप्रमाणे काही दिवसांत काँग्रेसही पृथ्वीवरून नाहीशी होईल, असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे डायनासोर पृथ्वीवरून नाहीसे झाले, त्याचप्रमाणे काही दिवसांत काँग्रेसही पृथ्वीवरून नाहीशी होईल, असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी काही वर्षांनी मुलं विचारतील कोण काँग्रेस? असं म्हटलं आहे.

खांडवा येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत होते की, आमचं सरकार स्थापन झालं तर देशातून गरिबी दूर करू. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनीही सांगितलं होतं. पण गरिबी कोणीही दूर केली नाही, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे."

राजनाथ सिंह यांनी अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. सूरत आणि इंदूरचा उल्लेख करून ते म्हणाले की, "एक चमत्कार घडला आहे, काँग्रेसचे उमेदवार भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. याआधीही लोकसभा निवडणुकीत 20 वेळा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं त्यांनी उपरोधिकपणे सांगितलं. पण तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही."

"भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर लोकशाही धोक्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस हे बुडणारे जहाज असून जगातील कोणतीही शक्ती त्यांना बुडण्यापासून वाचवू शकत नाही. आता काँग्रेसला घालवायचं हे जनतेने ठरवलं आहे" असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा