शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 7:50 PM

वाशिम: आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात असून अनेकठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर टाकण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा, असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या शिष्य वैभवीश्रीजी यांनी येथे केले.  श्री हनुमान रामकथेचे तृतीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. 

ठळक मुद्देवैभवीश्रीजी यांचे प्रतिपादनस्त्रीभू्रण हत्या देशाला लागलेला कलंक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात असून अनेकठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर टाकण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा, असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या शिष्य वैभवीश्रीजी यांनी येथे केले.  श्री हनुमान रामकथेचे तृतीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना आज अनेकजण कन्येची जन्मापुर्वीच गर्भात हत्या करतात. हा देशाला लागलेला मोठा कलंक आहे. मुलींना सुध्दा जन्माला येवू द्या, कारण भविष्यात ती लता मंगेशकर, सुनिता विल्यम, झाशीची राणी बनू शकते. मुलींनी सुध्दा श्रृंगार करताना संस्कृतीचे भान ठेवावे. ज्यामुळे वासना उत्पन्न होईल, असे वस्त्र परिधान करु नये. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेला श्रृंगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणातून प्रकाशित झाला आहे. ज्यादिवशी या देशामध्ये खºयाअर्थाने मुलींना समान दर्जा देवून तीचा सन्मान केल्या जाईल त्यादिवशी निश्चितच दुष्काळ नष्ट होईल. प्रकृती आनंद व्यक्त करुन भरपूर पाण्याचा वर्षाव करील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जेव्हा आपण कुणाला मदत करतो, तेव्हा तो प्रसाद बनतो. जिथे कथा होते, ते स्थळ तीर्थ बनते. चांगले कर्म आपल्याला आनंद मिळेल म्हणून करु नका, तर आनंदाने चांगले कर्म करा. कथेमुळे जीवनाची व्यथा नष्ट झाली पाहीजे. सद्गुरूची निवड करताना त्याची पुर्णपणे खात्री करुन घ्या, धर्मग्रंथात साधू व संतांचे लक्षण दिलेले आहे. भगवंताच्या कृपेने मिळालेले पद कुणीही घेवू शकत नाही. गुरुंच्या प्रती समर्पणाची श्रध्दा ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.