शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

वाशिम तालुक्यातील गारपीटग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन: शिवसेनेची आक्रमक भूमिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:21 PM

वाशिम:   नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

वाशिम:  गेल्या चार दिवसापासून तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे वाशिम तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले असून, त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदनाचा आशय असा की, गेल्या तीन ते चार दिवसांत वाशिम तालुक्यात जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस, आंबा, हरभरा, भाजीपाला, गहू, संत्रा आदि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता शेतकºयांना कृषी उत्पादनातून कोणतीच आशा उरली नसून, उदरनिर्वाहाची कोणतीच सोय नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामा करण्यासह तातडीने अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. या प्रक्रियेला विलंब झाल्यास शेतकरी निराश होवून आत्महत्येचा मार्ग पत्करण्याची भिती व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात घेत नुकसानग्रस्त पिके व घराचे पंचनामे करुन त्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. तहसिलदारांना निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, तालुका सचिव विजय खानझोडे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, उपतालुकाप्रमुख गजानन इढोळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीटShiv Senaशिवसेना