शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली वाहने उभी कुठे करायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:29 IST

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात धावणाऱ्या बेकायदा रिक्षांवर आरटीओ कारवाई करते; मात्र या जप्त केलेल्या रिक्षा ठेवण्यासाठी आरटीओकडे स्वतःची ...

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात धावणाऱ्या बेकायदा रिक्षांवर आरटीओ कारवाई करते; मात्र या जप्त केलेल्या रिक्षा ठेवण्यासाठी आरटीओकडे स्वतःची जागाच उपलब्ध नसल्याने कारवाईत अडथळे येत आहेत. राज्यात होत असलेली अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस व विरारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे बेकायदा वाहतूक तपासणी करण्यात येते. या तपासणीत जप्त केलेली वाहने राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात पार्किंग केली जातात. त्यानुसार विरार परिवहन विभागाकडून जप्त केलेली वाहने नालासोपारा येथील एसटी आगार परिसरात ठेवण्यात येत आहेत. मात्र तीही जागा अपुरी पडू लागल्यामुळे बेकायदा रिक्षांवरील कारवाईही थंडावली आहे.

एसटी परिवहन महामंडळ प्रतिदिन ५० रुपये भूभाडे आकारते. वाहनमालकांकडून भू-भाड्याच्या रकमेवर १८ टक्के वस्तू व सेवा कर आकारण्यात येऊन भू-भाडे वसूल करण्यात यावे, असे आदेश आहेत. रिक्षामालकाने वाहतूक विभागाकडे कारवाईपोटीचा दंड भरल्यानंतर वाहतूक विभाग या रिक्षा साेडण्याच्या सूचना परिवहन विभागाला करते, मात्र आता नालासोपारा येथील एसटी आगारातही जागा उपलब्ध नसल्याने विरार परिवहन विभागाने विरार-अर्नाळा डेपोचा पर्याय स्वीकारला आहे.

अर्नाळा डेपोतही जागा उपलब्ध नसून अर्नाळा आगाराने जप्त केलेली वाहने घेऊन जाण्याची भुणभुण आरटीओच्या मागे लावली असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.पालघर जिल्ह्यात आजघडीला ३८ हजारांपेक्षा जास्त रिक्षा धावतात. बेकायदा रिक्षा, परवाना, बॅच नसणे, ड्रेस कोड नसणे, प्रवासी संख्येचे उल्लंघन अशा रिक्षावरही प्रत्येक दिवशी वाहतूक निरीक्षक कारवाई केली जाते. या कारवाईत २०० रुपये इतका दंड जागेवर लावला जातो. अन्यथा हा दंड थकीत दर्शवून अशा रिक्षाचालकांविरोधात कारवाई करून या रिक्षा जप्त केल्या जातात. रिक्षा ठेवण्यासाठी जागाच नसल्यामुळे रिक्षांवरील आरटीओची कारवाई थंडावली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार