शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ग्रामीण भागातूनही रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:42 PM

आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न : जंगल तोड, वणवे यामुळे रानभाज्या होताहेत दुर्मिळ

शशिकांत ठाकूरकासा : पावसाळा आला की पूर्वी ग्रामीण भागात सर्रास रानभाज्याचा वापर होत असे. मात्र आता रानभाज्या दुर्मिळ झाल्याने त्याचा वापरही कमी होऊ लागला आहे. पावसाळ्यात पूर्वी खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबे तर पावसाळाभर आहारात रानभाज्याचाच वापर करत असत. काहीजण जंगलात जाऊन रानभाज्या शोधून त्या शहरीभागात विकून काही लोकांना रोजगार ही मिळत असे.

रानभाज्यामध्ये शेवली, कोळीभाजी, लोत, माठभाजी, टाकले, तेर, चाईचे देठ, बाफली, कोहरेल, धोधडी, अळू या पालेभाज्या तर बांबूचे देठ, कंद, कडूकंद या कंदभाज्या पेंढार, अळू, काकड, भोकर, कर्टुले, करडू, टेटवी, आळीम या फळभाज्यांचा आहारात वापर केला जात असे. यामध्ये शेवली या भाजीला विशेष मागणी असून त्यांच्यातील खाजटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये काकड टाकली जातात. तर उंच डोंगर उतारावर आढळणाऱ्या बाफली रानभाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे त्यांची फळेही साठवून ठेवली जातात.कोवळ्या बांबूचा देठ त्यास ग्रामीण भाषेत ‘वास्ता’ असे संबोधले जात असून त्यापासून त्याला काप देऊन शिंद ही भाजी मिळविली जाते. त्याचा ग्रामीण भागात आजही बºयाच ठिकाणी वापर केला जातो.

परंतु आता बांबूची झाडे कमी झाल्याने शिंद बनविण्यासाठी जंगलातून लोक आता कोवळे बांबूचे देठ शोधून आणतात. कर्टुले या फळभाजीला ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही मोठी मागणी आहे. तर कडूकंदापासून वली बनवतात त्या कडू असल्याने त्यांच्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये राखाडी टाकून त्या शिजविल्या जातात.