शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसईवर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: March 20, 2016 00:41 IST

सध्याच्या लोकसंख्येला दररोज किमान २२२ एमएलडीची गरज असताना प्रत्यक्षात मात्र १३० एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने आधीच वसई विरार परिसरात पाणी टंचाई भेडसावत आहे.

- शशी करपे,  वसईसध्याच्या लोकसंख्येला दररोज किमान २२२ एमएलडीची गरज असताना प्रत्यक्षात मात्र १३० एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने आधीच वसई विरार परिसरात पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यातच पेल्हार आणि उसगावचे पाणी घटल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नव्या योजनेतून १०० एमएलडीचे पाणी मिळण्यास उशिर होणार असल्याने यंदा वसईकरांना पावसाळ्यापर्यंत तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर वसई विरार परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होणार आहे. वसई विरार शहराला सध्या पेल्हार धरणातून १० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी आणि सूर्या योजनेतून १०० एमएलडी मिळून दररोज १३० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. सध्याची लोकसंख्या लक्षात घेऊन किमान २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यासाठी सूर्या टप्पा तीनमधून १०० एमएलडी वाढीव पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. पण, ही योजना पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने सध्या १३० एमएलडीवर वसईकरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जातो. पाण्याचे योग्य नियोेजन व्हावे याकरीत वसई विरार परिसरात दोन-तीन दिवस आड पाणी पुरवठा करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिकेने गेल्या वर्षभरापासून नवीन नळजोडण्या देण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे नव्या वसाहती आणि बेकायदा चाळी यासह झोपडपट्ट्यांना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नव्या वसाहती सध्या टँकरवर अवलंबून असून झोपडपट्टीवासिय मिळेल तिथून पाणी भरताना दिसतात. आता पुढील दोन महिने संपूर्ण वसई तालुक्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. विरारचे पापडखिंंड तलाव कोरडे पडल्याने त्यातून दररोज मिळणारे दीड-दोन एमएलडी पाणी बंद झाले आहे. पेल्हार आणि उसगावचे पाणी आटल्याने तिथल्या पाणी पुरवठयात मोठी घट झाली आहे. पेल्हार धरणातून सध्या सात एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. उसगाव धरणातून १६ ते १७ एमएलडी पाणी पुरवठा होऊ लागला आहे. सूर्या योजनेतून मात्र दररोज १०० एमएलडी पाणी मिळत आहे ही दिलासाजनक बाब आहे. पण, गळती आणि चोरी पाहता दररोज १२५ एमएलडी इतकाच पाणी पुरवठा होऊ लागला आहे. पाण्याची गरज पाहता सध्या वसईकरांना किमान १०० एमएलडीचा तुटवडा आहे. उन्हाळा वाढत जाईल तस-तसा पेल्हार आणि उसगावचे पाणी घटणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून वसईकरांच्या पाणी पुरवठ्यात मोठी घट होणार आहे. सूर्या टप्पा क्रमांक ३ मधून मिळणारे वाढीव १०० एमएलडी पाणी मे महिन्यापर्यंत मिळणे अशक्य असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात वसईत पाणी टंचाईचे चटके जाणवणार आहेत. पाणी टंचाईचे हे संकट लक्षात घेऊनच गेल्या दोन-तीन वर्षांपासून वसई विरार परिसरात दोन-तीन दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. १०० एमएलडीची योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत वसईकरांना पाणी टंचाईचा सामना करावाच लागणार आहे.