शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

मोखाड्यातील ८६ गावे तहानली, टँकर लॉबी झाली गब्बर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:52 IST

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईकाळात येथील टॅँकर लॉँबी पोशित होत असून तालुक्यातील ८६ गावपाड्यांना टंचाईचे चटके बसत आहेत.

नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय कमी होण्या ऐवजी दरवर्षी वाढत चालली असुन महिलांना मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात जवळपास पाच धरणे असुन त्याद्वारे १२० किलो मीटर अंतरावरील मुबंई शहराला त्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना येथील गाव-पाड्यांना पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागत आहे.

तालुक्यातील धामणी, दापटी, गोळीचापाडा, स्वामीनगर, शास्त्रीनगर, भोवाडी, बिवलपाडा, कुडवा, आसे, वारघरपाडा, पेडक्याचीवाडी केवणाळा गोमघर, डोल्हारा, मोरहंडा, साखरवाडी, वाशिंद, शेलमपाडा, बनाचीवाडी सप्रेवाडी जांभूळवाडी चिकन पाडा बेरीस्ते, शेंड्याचीमेट अशा ८६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले आहे. दिवसाआड पाणी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना २४ टँकर ने पाणी पुरवठा सुरू असून हिरवे पिंपळपाडा, पाटीलपाडा, कोडेसागवाडी, पारध्याचीमेट, कातकरीवाडी, उंबरवाडी, तेली उंबरपाडा, रामडोह अशा ११ गाव पाड्याची टँकरने पाणी पुरवठा मागणी प्रस्ताव पडून आहे.

दिवसा गणिक टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे मागणी प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे. यामुळे उन्हाळाच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºय परिस्थितीवर कायम स्वरुपी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडावासीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºया विहिरी पासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २० - २५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.

विक्रमगडची मदार तीन टॅँकरवर संभाव्य आराखडा ८४ गावांचाविक्रमगड : तालुक्यात उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी झाली असून तालुक्यातील नदी, नाले, ओहळ, आटून गेले आहे त्यांमुळे लोकाना पिण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ही दहाकता अशीच राहली तर तालुक्यात भिषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. संभाव्य आराखडा हा ८४ गावाचा बनविण्यात आला असून आता पर्यत तालुक्यातील खुडेद पैकी धोडीपाडा, कुडाचापाडा झापपाडा या तीन ठिकाणी टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. कोडगाव पैकी कोडगाव गावठाण, डोगरपाडा, कातकरीपाडा, विळशेत तसेच आंबिवली पैकी गवतेपाडा, ठाकरेपाडा, विजयनगर या गावपाड्यानी टँकरची मागणी केली आहे. प्रस्तावित टॅँकर प्रस्ताव प्रलंबित असल्याने समस्या वाढल्या आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणी