शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्यातील ८६ गावे तहानली, टँकर लॉबी झाली गब्बर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:52 IST

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईकाळात येथील टॅँकर लॉँबी पोशित होत असून तालुक्यातील ८६ गावपाड्यांना टंचाईचे चटके बसत आहेत.

नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय कमी होण्या ऐवजी दरवर्षी वाढत चालली असुन महिलांना मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात जवळपास पाच धरणे असुन त्याद्वारे १२० किलो मीटर अंतरावरील मुबंई शहराला त्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना येथील गाव-पाड्यांना पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागत आहे.

तालुक्यातील धामणी, दापटी, गोळीचापाडा, स्वामीनगर, शास्त्रीनगर, भोवाडी, बिवलपाडा, कुडवा, आसे, वारघरपाडा, पेडक्याचीवाडी केवणाळा गोमघर, डोल्हारा, मोरहंडा, साखरवाडी, वाशिंद, शेलमपाडा, बनाचीवाडी सप्रेवाडी जांभूळवाडी चिकन पाडा बेरीस्ते, शेंड्याचीमेट अशा ८६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले आहे. दिवसाआड पाणी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना २४ टँकर ने पाणी पुरवठा सुरू असून हिरवे पिंपळपाडा, पाटीलपाडा, कोडेसागवाडी, पारध्याचीमेट, कातकरीवाडी, उंबरवाडी, तेली उंबरपाडा, रामडोह अशा ११ गाव पाड्याची टँकरने पाणी पुरवठा मागणी प्रस्ताव पडून आहे.

दिवसा गणिक टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे मागणी प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे. यामुळे उन्हाळाच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºय परिस्थितीवर कायम स्वरुपी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडावासीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºया विहिरी पासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २० - २५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.

विक्रमगडची मदार तीन टॅँकरवर संभाव्य आराखडा ८४ गावांचाविक्रमगड : तालुक्यात उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी झाली असून तालुक्यातील नदी, नाले, ओहळ, आटून गेले आहे त्यांमुळे लोकाना पिण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ही दहाकता अशीच राहली तर तालुक्यात भिषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. संभाव्य आराखडा हा ८४ गावाचा बनविण्यात आला असून आता पर्यत तालुक्यातील खुडेद पैकी धोडीपाडा, कुडाचापाडा झापपाडा या तीन ठिकाणी टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. कोडगाव पैकी कोडगाव गावठाण, डोगरपाडा, कातकरीपाडा, विळशेत तसेच आंबिवली पैकी गवतेपाडा, ठाकरेपाडा, विजयनगर या गावपाड्यानी टँकरची मागणी केली आहे. प्रस्तावित टॅँकर प्रस्ताव प्रलंबित असल्याने समस्या वाढल्या आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणी