शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मोखाड्यातील ८६ गावे तहानली, टँकर लॉबी झाली गब्बर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:52 IST

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईकाळात येथील टॅँकर लॉँबी पोशित होत असून तालुक्यातील ८६ गावपाड्यांना टंचाईचे चटके बसत आहेत.

नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय कमी होण्या ऐवजी दरवर्षी वाढत चालली असुन महिलांना मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात जवळपास पाच धरणे असुन त्याद्वारे १२० किलो मीटर अंतरावरील मुबंई शहराला त्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना येथील गाव-पाड्यांना पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागत आहे.

तालुक्यातील धामणी, दापटी, गोळीचापाडा, स्वामीनगर, शास्त्रीनगर, भोवाडी, बिवलपाडा, कुडवा, आसे, वारघरपाडा, पेडक्याचीवाडी केवणाळा गोमघर, डोल्हारा, मोरहंडा, साखरवाडी, वाशिंद, शेलमपाडा, बनाचीवाडी सप्रेवाडी जांभूळवाडी चिकन पाडा बेरीस्ते, शेंड्याचीमेट अशा ८६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले आहे. दिवसाआड पाणी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना २४ टँकर ने पाणी पुरवठा सुरू असून हिरवे पिंपळपाडा, पाटीलपाडा, कोडेसागवाडी, पारध्याचीमेट, कातकरीवाडी, उंबरवाडी, तेली उंबरपाडा, रामडोह अशा ११ गाव पाड्याची टँकरने पाणी पुरवठा मागणी प्रस्ताव पडून आहे.

दिवसा गणिक टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे मागणी प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे. यामुळे उन्हाळाच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºय परिस्थितीवर कायम स्वरुपी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडावासीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºया विहिरी पासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २० - २५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.

विक्रमगडची मदार तीन टॅँकरवर संभाव्य आराखडा ८४ गावांचाविक्रमगड : तालुक्यात उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी झाली असून तालुक्यातील नदी, नाले, ओहळ, आटून गेले आहे त्यांमुळे लोकाना पिण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ही दहाकता अशीच राहली तर तालुक्यात भिषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. संभाव्य आराखडा हा ८४ गावाचा बनविण्यात आला असून आता पर्यत तालुक्यातील खुडेद पैकी धोडीपाडा, कुडाचापाडा झापपाडा या तीन ठिकाणी टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. कोडगाव पैकी कोडगाव गावठाण, डोगरपाडा, कातकरीपाडा, विळशेत तसेच आंबिवली पैकी गवतेपाडा, ठाकरेपाडा, विजयनगर या गावपाड्यानी टँकरची मागणी केली आहे. प्रस्तावित टॅँकर प्रस्ताव प्रलंबित असल्याने समस्या वाढल्या आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणी