शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

जनआंदोलनचे नगरसेवक घरवापसीच्या तयारीत

By admin | Updated: May 6, 2015 01:10 IST

वसई-विरार मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. तिकिटासाठी ‘काय पन’ हा नारा दबक्या आवाजात घुमू लागला आहे.

दीपक मोहीते, वसईवसई-विरार मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. तिकिटासाठी ‘काय पन’ हा नारा दबक्या आवाजात घुमू लागला आहे. ‘निवडून न येऊ शकणाऱ्या पक्षाचे तिकट नको रे बाबा’ अशी कुजबूज सर्वत्र ऐकू येत आहे. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षाचे इच्छुक वसई जन आंदोलन समितीमधून घरवापसीच्या तयारीला लागले आहेत. यात सेनेच्या नेत्यांचा सर्वाधिक भरणा आहे. युतीला चांगले दिवस आल्यामुळे आपल्यालाही ‘अच्छे दिन आयेंगे’ अशा मनस्थितीत असलेले इच्छुक आता पक्षश्रेष्ठीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवू लागले आहेत.मनपाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सेनेच्या अनेक नेत्यांनी वसई जन आंदोलन समितीच्या (लोकहितवादी लीडर पार्टी) तिकिटावर निवडणुका लढवल्या. यात अनेकांनी विजयही मिळवला. मनपातील समाविष्ट गावांचा प्रश्न हा त्यावेळी प्रचारात कळीचा मुद्दा झाला होता. ग्रामीण भागातील जनतेची मते या भावनिक प्रश्नावर एकवटली व ग्रामीण भागात लोकहितवादी लीडर पार्टीला बऱ्यापैकी यश मिळाले. परंतु ते यश फार काळ टिकले नाही. विधानसभा, जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या पक्षाचा दारूण पराभव झाला व पक्षाची घसरण सुरू झाली. सलग झालेल्या पराभवाने पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले. लवकरच होणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये या पक्षाच्या नेत्यांनी स्वारस्य न दाखवल्यामुळे अनेक नेते व पदाधिकारी आता घरवापसीच्या मार्गावर आहेत. अनेक नेत्यांनी सेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर मनसेचे नेतेही आता सेनेच्या वाटेवर आहेत. जुन्या पक्षाची साथ, राजकीय विकास अशा निर्णयाप्रत ही मंडळी आली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक दिग्गज नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अंधारात सापडले आहे. राजकीय पक्षंनी मात्र अभ्यासू तसेच जनमानसामध्ये चांगली प्रतिमा असणाऱ्या नगरसेवकांना सुरक्षित प्रभाग देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.परत येणाऱ्यांना तिकीटे नकोत४घरवापसी करणाऱ्यांना पुन्हा तिकिट देण्यात येऊ नयेत असा एक मतप्रवाह असून सेनेचे काही पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या संदर्भात मातोश्री दरवाजे ठोठावणार आहेत. गेल्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा संधी देता काम नये अशी मागणी होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या अवस्था लक्षत घेत या दोघांना स्वबळावर निवडणूका लढवणे शक्य होणार नाही. त्यामुळे आ. ठाकूर यांच्याशी चर्चा करून प्रत्येकी दोन ते तीन जागा पदरात पाडून घेण्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न आहेत. ४प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही आ. ठाकूर यांच्याशी चांगला घरोबा आहे. त्यामुळे आ. ठाकूर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘जो कोणी सत्तेत असेल तो आपला मित्र’ हे नाते गेली १६ वर्षी पाळणारे आ. ठाकूर ऐनवेळी काय खेळी खेळतात यांवर निवडणुकीच्या लढतीचे चित्र अवलंबून आहे.