शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

चाेरीच्या उद्देशाने केली सुरक्षारक्षकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:59 AM

तिघे अटकेत : अल्पवयीन मुलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : सोमवारी पहाटे संख्येश्वरनगरमध्ये राहणाऱ्या सुरक्षारक्षकाचा कामावर जाताना चाकूने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येप्रकरणी तुळिंज पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हत्येपूर्वी त्यांनी दाेघांना लुटले असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, तुळिंज पाेलिसांची गस्त असती तर या तिन्ही घटनाच घडल्या नसत्या आणि सुरक्षारक्षकाचा जीवही वाचला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ओम साई चाळीत राहणाऱ्या कैलास देवेंद्र पाठक (४८) यांची कामावर जात असताना घराजवळच तीन आरोपींनी पैसे किंवा मोबाइलसाठी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या तीन आरोपींपैकी दोन आरोपी हे १६ वर्षांचे आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी हितेश मंगेश भोसले (१८) याला अटक केले आहे. या तिन्ही आरोपींनी या हत्येपूर्वी पहाटे ३ ते पावणे चार वाजण्याच्या दरम्यान जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. निळेगावात राहणारा रिक्षाचालक अमोल जयराम इंगळे (३२) याच्यावर साडेतीन वाजण्याच्या सुमारास नवनीत हॉस्पिटलजवळ चाकूचा धाक दाखवून छाती व पोटावर हल्ला केला.  त्यांनी अमोलच्या खिशातील ५०० रुपये काढून मोबाइल खेचून पळून गेले. तर दुसऱ्या घटनेत ४ वाजण्याच्या सुमारास संख्येश्वरनगरमध्येच टॅक्सीचालक हसमतअली पठाण (६८) यांनाही याच तिघांनी हातात चाकू घेऊन मनसे ऑफिसच्या जवळ चाकू मारण्याचा धाक दाखवून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जखमी करून पैसे आणि मोबाइल हिसकावून पळून गेले. तिसऱ्या घटनेत सुरक्षारक्षकाने पैसे व मोबाइल देण्यास नकार दिल्यानंतर त्याची हत्या केल्याचा  संशय आहे.

हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना भिवंडी बालसुधारगृहात पाठवले आहे. एका आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. - राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे